शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

'पौष्टिक तृणधान्याच्या लागवडीवर भर द्या'; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 12:06 PM

पालघर तालुक्यातील नांदगाव तर्फे तारापूर येथील नांदबादेवी मंदिरात  'तृणधान्याचे फायदे' या विषयावर  शेतकरी वर्गात जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला.

पालघर: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे निमित्त साधून पालघर तालुक्यातील नांदगाव तर्फे तारापूर येथील नांदबादेवी मंदिरात 'तृणधान्याचे फायदे' या विषयावर  शेतकरी वर्गात जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला.

पौष्टिक तृणधान्यात ज्वारी, बाजारी, नाचणी, वरई, राळा, कोद्रा, कुटकी, सावा, राजगिरा व इतर पिकांचा समावेश होतो. मात्र, लहान मुले, मुली, गर्भवती स्त्रिया यांना सध्या या पोषणयुक्त आहारापासून दुरावत चालले आहेत. तृणधान्य पिकांच्या लागवडीबरोबरच त्यांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून आहारातील पौष्टिकतेचे प्रमाण वाढविण्यासाठी, कृषी विभागातर्फे असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. शेतकरी वर्गाने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व जाणून घ्यायला हवे, असे मत यावेळी कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक सी.व्ही. मोकाशी यांनी व्यक्त केले.

'आजच्या तरुणांची जंकफूडला अधिक पसंती असते, परंतु त्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत. त्यामुळे शीतपेये, बाहेरचे पदार्थ, जंकफूड आदींचे सेवन न करता पौष्टिक तृणधान्ये सेवन करा व इतरांनाही त्याचे महत्त्व पटवून द्या,' असे आवाहन नांदगाव तर्फे तारापूर गावातील सरपंच समीर मोरे यांनी शेतकरी बंधू भगिनींना आपल्या भाषणात केले. तसेच पौष्टिक तृणधान्याच्या सेवनामुळे विविध आजारांना प्रतिबंध करता येतो, त्यामुळे तृणधान्याचा आहारात आवर्जून समावेश करावा, असे आवाहन कृषि सहाय्यक तनुजा मुकणे यांनी केले.

कृषी सहाय्यक रेखा पाटील, प्रितम गोवारी व गावाचे कृषी सहाय्यक योगेश साळुंके यांनी पौष्टिक तृणधान्यचे पंचनसंस्थेवरील फायदे सांगितले. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्.या विविध योजनेद्वारे तृणधान्य उत्पादन व लागणारी बाजारपेठ कशी उपलब्ध करून घेता येईल याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, तेजस्वी घरत, दीपा पाटील, गावातील विविध गटाचे गट प्रमुख व महिला व पुरुष शेतकरी वर्गही उपस्थित होते .

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रpalgharपालघर