शहरं
Join us  
Trending Stories
1
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
2
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
3
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
4
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
5
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
6
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या आरोपांनंतर मोठी घोषणा
7
अरे देवा! जेलमध्ये रामलीला, कैद्यांनी केला वानरांचा रोल; सीतेला शोधायला गेले अन् पळाले
8
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
9
भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
10
कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
11
'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-
12
'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
13
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."
15
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
16
चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या
17
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल
18
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
19
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
20
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

वाहतूक सिग्नलपोटी पालिकेकडून लाखोंचा निधी खर्ची; मात्र ती पालिकेचीच जबाबदारी असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 3:14 PM

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील महत्वाच्या वाहतुक बेटावर व क्रॉसिंगवर लावण्यात आलेल्या सिग्नलपोटी पालिकेला वार्षिक देखभाल, दुरुस्तीसाठी लाखोंच्या निधीचा खर्च येत असल्याची बाब आरटीआय कार्यकर्ता कृष्णा

राजू काळे 

भार्इंदर: मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील महत्वाच्या वाहतुक बेटावर व क्रॉसिंगवर लावण्यात आलेल्या सिग्नलपोटी पालिकेला वार्षिक देखभाल, दुरुस्तीसाठी लाखोंच्या निधीचा खर्च येत असल्याची बाब आरटीआय कार्यकर्ता कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातुन उजेडात आणली आहे. मात्र हि पालिकेची जबाबदारी असल्याचा दावा पालिकेच्या बांधकाम विभागाकडुन करण्यात आला आहे. 

झपाट्याने विकसित होणाय््राा मीरा-भार्इंदर  शहरात मोठ्याप्रमाणात वाहनांची देखील संख्या वाढत आहे. वाहनांच्या तुलनेत शहरातील रस्ते तोकडे पडत असले तरी पालिकेच्या १९९७ मधील मंजुर विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यांची आठवण प्रशासनाला सध्या होऊ लागली आहे. उपलब्ध रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी शहरात विभागीय वाहतुक प्राधिकरण, ठाणे अंतर्गत वाहतुक शाखा कार्यरत असली तरी रस्त्यांवरील वाहतुक सिग्नलद्वारे नियंत्रित करण्यासाठीचा खर्च मात्र पालिकेला उचलावा लागत आहे. पालिकेने स्वखर्चातुन शहरातील महत्वांच्या वाहतुक बेटांवर तसेच क्रॉसिंगवर सुमारे १७ सिग्नल बसविले आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील गोल्डन नेस्ट ते काशिमिरा वाहतुक बेटादरम्यान ८, पश्चिम महामार्ग क्र. ८ वर ५, मीरारोड येथील पुनमसागर, रसास व शांतीनगर सेक्टर ११ मध्ये प्रत्येकी १ व भार्इंदर पश्चिमेकडील मॅक्सस मॉल येथे १ सिग्नलचा समावेश आहे. त्यापोटी पालिकेला प्रत्येक वर्षामागे सुमारे ११ लाखांचा खर्च येत असल्याची बाब गुप्ता यांनी माहिती अधिकारातुन उजेडात आणली आहे. सिग्नलसह नियंत्रित करण्यासाठी  वाहतुक शाखेत सुमारे ८० हुन अधिक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे ४० ते ५० अधिकारी व कर्मचारीच दैनंदिन कामजासाठी उपलब्ध होत असल्याने अनेकदा वाहतुकीचे नियोजन सिग्नलवरच अवलंबुन असते. हि उणीव भरुन काढण्यासाठी पालिकेनेच वाहतुक शाखेच्या मदतीसाठी सुमारे ५० कंत्राटी ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले आहेत. तरी देखील महत्वांच्या वाहतुक बेटांखेरीज काही ठिकाणच्या सिग्नल पॉर्इंटवर कर्मचारीच उपलब्ध नसतात. त्यामुळे सिग्नलवरच वाहतुकीचे नियोजन निर्भर असले तरी यातील काही सिग्नल अनेकदा बंदावस्थेत असतात. हे सिग्नल बसविण्यापासुन ते त्याच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी पालिकेची असली तरी सिग्नलला होणाय््राा वीजपुरवठ्याचा खर्च देखील पालिकेलाच सोसावा लागतो. तो वाचविण्यासाठी सिग्नलवर सोलार पॅनल बसविण्याचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले असतानाही सुमारे चार ते पाच सिग्नलवरच ते बसविण्यात आले आहेत. याखेरीज रस्त्यावर वाहतुक नियमांतर्गत झेब्रा क्रॉसिंग, लेनचे पट्टे व दुभाजकाच्या रंगरंगोटीच्या खर्चाचा भार देखील पालिकेलाच उचलावा लागत असल्याने पालिकेने हा खर्च भरुन काढण्यासाठी कोणतीही पावले अद्याप उचललेली नाहीत. त्यातच पालिकेचे उत्पन्न मर्यादित असताना खर्चात मात्र अवास्तव वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेने खाजगी व्यावसायिकांच्या सहभागातुन वाहतुकीच्या नियोजनावर होणारा खर्च भरुन काढावा, अशी मागणी गुप्ता यांनी पालिकेकडे केली आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर