शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

पांढरा कांदा वसईतून हद्दपार होण्याची भीती; अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 12:07 PM

मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे या उत्पादनात घट होत आहे.

विरार : वसई तालुक्यात सर्वात जास्त पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जात असे. परंतु मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे या उत्पादनात घट होत आहे. होणाऱ्या नुकसानीमुळे कांद्याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून, तालुक्यातून पांढरा कांदा हद्दपार होताना दिसत आहे.

वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणत पांढऱ्या कांद्याचे उत्पादन पूर्वीपासून घेतले जात होते. परंतु या उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून घट होत चालली आहे. जानेवारी महिन्यात कांद्याची लागवड केली जाते आणि या लागवडीसाठी जमीनही दमट स्वरूपाची असावी लागते. परंतु जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे कांद्याचे बीज खराब झाले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांद्याची शेती परवडत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे, असे काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

पांढऱ्या कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने वसईतील शिरगाव, खानिवडे, शिवनसई, पारोळ, थल्याचा पाडा, अर्नाळा, वसईगाव या ठिकाणी घेतले जाते. साधारण एका कांद्याची माळ ४० ते ५० रुपयांपर्यंत विकली जाते. त्या माळेचे वजन दोन ते तीन किलो असते. हा कांदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येतो. परंतु शेतकऱ्यांना कांद्याची लागवड ही अवकाळी पावसामुळे दोन वेळा करावी लागली असल्यामुळे कांद्याचे पीक उशिरा येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

पांढरा कांदा हा औषधी म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे त्याला दर जास्त आणि बाजारात मागणीही असते. मात्र यंदा अवकाळीने पांढऱ्या कांद्याचे पीक वाया गेले.

गेल्या दोन - तीन वर्षांपासून मी पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेते. परंतु या उत्पादनातून मला नफा आलेला नाही. कांद्याची लागवड झाल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शहरात कांदा पोहोचलेला नाही. - सुगंधा जाधव,माजी सभापती, भाताणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार