शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

किल्ल्यात साकारले वसईच्या संग्रामाचे भित्तीचित्र

By admin | Published: January 10, 2017 5:49 AM

वसई-विरारच्या भूमिपुत्रांना पोर्तुगीजांच्या छळातून मुक्त करण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी ‘वसईची मोहीम’ हाती घेतली व डोंगर, दऱ्या, नद्या ओलांडत साष्टीत दाखल झाले.

सुनील घरत / पारोळ (ता.वसई)वसई-विरारच्या भूमिपुत्रांना पोर्तुगीजांच्या छळातून मुक्त करण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी ‘वसईची मोहीम’ हाती घेतली व डोंगर, दऱ्या, नद्या ओलांडत साष्टीत दाखल झाले. या मोहिमेत २५ हजार घोडदळ, ४० हजार पायदळ, ४ हजार सुरुंग तज्ज्ञ, ५ हजार उंट, ५० हत्ती होते. वसईला मुक्त, सुखी व समृद्ध करण्यासाठी हाती घेतलेल्या या मोहिमेत मराठ्यांचे जवळपास २२ हजार सैनिक हुतात्मा झाले. वज्राईच्या कृपेने व मराठ्यांच्या पराक्र मामुळे पोर्तुगीज हारले व भगवा जरीपटका वसईच्या जंजिऱ्यावर फडकला. एकाच मातीचे, एकाच रक्ताचे, एकाच संस्कृतीच्या, भाषेच्या हिंदू व धर्मांतरीत ख्रिस्ती बांधवांनी स्वराज्य व सुराज्य लाभल्यामुळे आनंदी होऊन आप्पांना नजराणे समर्पित केले. एकूण एक फिरंगी वसई सोडून गेला. या संग्रामाचे भित्तीचित्र आज वसई किल्ल्यात साकारण्यात आले.वसई मोहिमेतील दगदग व प्रचंड हाल अपेष्टांमुळे एकाच वर्षात वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ रोजी दम्याच्या आजाराने चिमाजी अप्पांचे देहावसान झाले. पौष शु.एकादशीस आप्पांच्या अर्धांगिनी सौ.अन्नपूर्णाबाई सती गेल्या व त्यांचे स्वर्गारोहण झाले, असे पुण्यातील आप्पांच्या समाधीवर नमूद केले आहे.अशा या पराक्र मी, बुद्धिमान, ओजस्वी, कर्तव्यदक्ष, दयाळू व सिहष्णू नरवीर चिमाजी आप्पांची पुण्यतिथी सालाबादाप्रमाणे आमची वसईने चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे ८ जानेवारी, २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता साजरी केली. मशाली व पण त्यांच्या विलोभनीय प्रकाशात, तुतारीच्या गजरात, चिमाजी आप्पांना वसईच्या संग्रामाचे भित्तीचित्र समर्र्पित करु न आदरांजली वाहण्यात आली.वसई किल्ल्यात अनेक पर्यटक येतात. पण वसई किल्ल्याचे महत्व व इतिहास काय आहे, चिमाजी आप्पा कोण होते, त्यांचे जीवन कसे होते, या संबंधी कुठेही माहिती उपलब्ध होत नाही. येणाऱ््या पर्यटकांना इतिहास व त्याचे गांभीर्य कळावे या हेतूने ‘आमची वसई’ ने स्मारका बाहेरील भिंतिवर वसईच्या संग्रामाचे चित्र व नरवीर चिमाजी आप्पांची संक्षिप्त माहिती सादर केली आहे. त्याचप्रमाणे स्वराज्य व सुराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर मराठ्यांकडून व वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी स्वर्गवासी होणाऱ्या नरवीर चिमाजी आप्पांच्या जीवनातून बोध घेत युवा पिढीने किल्ल्याचे पावित्र्य राखावे. त्याचप्रमाणे विकासाच्या नावाखाली विनाश तर होत नाही ना? याचे भान ठेऊन आपली संस्कृती, बोलीभाषा, परंपरा, निसर्ग, ऐतिहासिक वास्तू, इत्यादी जतन करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन टीम आमची वसईने केले.