शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 9:42 PM

मीरा भाईंदर मध्ये पहिल्याच पावसात शनिवारी ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. बुधवारी देखील शहरातली परिस्थिती बिकट झाली होती.

मीरारोड - यंदाची नाले सफाई अत्यंत चांगली झाल्याचे सांगत, पाणी भरण्याचे खापर विकासक आदींवर फोडणाऱ्या प्रशासनावर संताप व्यक्त होत असून मीरा भाईंदर शहरात आजही पूरस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक विस्कळीत होऊन लोकांचे हाल झाले. 

मीरा भाईंदर मध्ये पहिल्याच पावसात शनिवारी ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. बुधवारी देखील शहरातली परिस्थिती बिकट झाली होती. मीरारोडच्या कृष्ण स्थळ मध्ये तर कमरे पेक्षा जास्त पाणी साचले होते. मीरारोड मधील शांती नगर, नया नगर, शीतल नगर, विजय पार्क, सिल्वर पार्क, कनकिया, मीरा गाव - हनुमान मंदिर, दहिसर चेकनाका, हटकेश, सुंदर सरोवर, मनउपास ट्रान्झिस्ट कॅम्प, घोडबंदर, काशीमीरा आदी जवळ पस बहुतांश परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. 

भाईंदरच्या बेकरी गल्ली. देवचंद नगर, मुर्धा, राई - मोरवा रस्ता, उत्तन, भाईंदर पूर्व औद्योगिक वसाहत, काशी नगर परिसर, बाळाराम पाटील मार्ग, महात्मा ज्योतिबा फुले ( केबिन रोड )  मार्ग, गोल्डन नेस्ट, तलाव मार्ग आदी जवळपास सर्वच परिसर जलमय झाला होता. 

लोकांच्या घरात पाणी शिरल्याने हाल झाले व अनेक वस्तूंचे नुकसान झाले. औद्योगिक वसाहती व दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले. वाहतूक विस्कळीत झाली होती. 

नालेसफाई अत्यंत चांगली झाली सांगत  विकासकांनी भराव करून इमारती बांधल्या मुळे तसेच अनेक वर्षांचे निर्माण झालेले प्रश्न  मुळे शहरात पाणी साचते असे उपायुक्त रवी पवार यांनी म्हटले होते. त्यावरून नागरिकांसह राजकारणी आदींनी, ह्या तर चोरांच्या उलट्या बोंबा असल्याची टीका चालवली आहे. 

शहरातील नैसर्गिक ओढे, खाड्या व नाले क्षेत्रातील बेकायदा भराव व बांधकामे यांना दिले जात असलेले अर्थपूर्ण संरक्षण, पोकळ व दिखावा ठरलेली नालेसफाई, कांदळवन - पाणथळ, सीआरझेड १ व नैसर्गिक क्षेत्रात होणारे बेकायदा भराव - बांधकामे ,  अंतर्गत गटार, नाले व खाड्यात टाकला जाणारा कचरा आदी गंभीर बाबीं कडे अनेक महापालिका अधिकारी, तत्कालीन नगरसेवक व राजकारणी यांचा कानाडोळा शहरात पुरस्थितीला कारणीभूत असल्याचे आरोप जागरूक नागरिकांनी केले आहेत. ह्या अधिकाऱ्यांवर निलंबनासह गुन्हे दाखल करण्याची कारवाईची मागणी लोकांनी केली आहे. 

दरम्यान दुपारपर्यंत १५० मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी मोठी भरती आणि त्याच वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचले असल्याचा कांगावा पालिका अधिकाऱ्यांनी चालवला आहे.  

तर पाणी साचणाऱ्या भागात ६५ ठिकाणी मोटार पंप लावून पाणी उपसा केला आहे.  पाणी तुंबते त्या भागात गटार, नाले आदींना ड्रिल ने मोठी भोके पाडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शहरातील पाणी साचलेल्या भागांची पाहणी करून आढावा घेतला व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असे पालिका उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरRainपाऊस