शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

नोटाबंदीविरोधात पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे

By admin | Published: January 10, 2017 5:38 AM

नोटबंदी जाहीर केल्या नंतरचे ५० दिवस उलटूनही बँकांत जमा असलेली आपली पुंजी मिळत नसल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे

पालघर : नोटबंदी जाहीर केल्या नंतरचे ५० दिवस उलटूनही बँकांत जमा असलेली आपली पुंजी मिळत नसल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे. आश्वासनांची खैरात करणाऱ्या या मोदी सरकारला महागाई कमी करण्यात अपयश आल्याने त्या आगीत होरपळलेल्या शेकडो महिलांनी जिल्हा महिला काँग्रेसने आयोजित थाळीनाद आंदोलनात सहभागी होऊन मोदी शासना विरोधातील आपला रोष व्यक्त केला.पालघर जिल्हातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील महिलांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली सर्व पुंजी बँकांत जमा केली होती. ५० दिवस कळ सोसा, आपली अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होईल या त्यांनी केलेल्या आवाहनावर सर्वांनी विश्वास ठेवला होता. मात्र ५० दिवसापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही कोलमडून गेलेले महिलांचे आर्थिक बजेट सावरले गेले नाही. बँका आणि एटीएमच्या समोरील रांगा कमी होत नसल्याने हातात पैसे नाही आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई याचा समतोल राखणे महिलांना असह्य झाले होते. देश-विदेशातील काळे धन बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मोदी सरकारने सांगितले असताना यांच्या पक्षातील अनेकांकडे कोट्यवधी रुपये सापडले आहेत. सर्वसामान्यांना आज बँकेतून ५ हजार रु पये मिळत नसताना त्यांच्या सरकार मधील एका मंत्र्यांच्या मुलांच्या लग्नात मात्र कोट्यवधी रु पयांची उधळण कशी केली जाते? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेशच्या सुदर्शना कौशिक यांनी उपस्थित केला. त्यामुळे केंद्रसरकारच्या अपयशा चा मोठा फटका ग्रामीण भागातील गरीब महिलांना मोठ्या प्रमाणात बसू लागला असून त्यांच्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी आज ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने जमल्या होत्या. (प्रतिनिधी)ग्रामीण आंदोलनात महिलांची संख्या जास्तच्महिला काँग्रेसच्या प्रभारी कौशिक,जिल्हाध्यक्षा राजश्री अहरे, तालुकाध्यक्षा मनीषा सावे,नगरसेविका उज्वला काळे,शमीम शेख, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित,जिल्हाध्यक्ष मनीष गणोरे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख,माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, निलेश राऊत इ. च्या वतीने थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. च्या मोर्च्याला पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो आदिवासी महिलांनी उपस्थिति दर्शवली . ‘ मोदी सरकार हाय हाय’ गली गली में शोर हे मोदी सरकार चोर है’ अशा घोषणा देत पालघर हुतात्मा चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय असा थाळी नाद आंदोलन करण्यात आले.