शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

शेतमालाला भाव, दुष्काळात साथ एवढे दिले तरी खूप झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 3:40 AM

शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग

सात वर्षांपासून एकही योजना राबवली नाहीसात वर्षांपूर्वी आम्हाला पंचायत समितीच्या अनुदानातून विंधण विहीर मिळाली. त्यानंतर मात्र, आजपर्यंत कोणतीही योजना आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. वा या योजनांची आम्हाला कोणतीच माहिती मिळत नाही. आम्ही शेती करतो, त्यासाठी औजारे उपलब्ध नसतात. ती आम्हाला मिळायला हवीत. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल. आज शासनाने ज्या योजना राबवल्या आहेत, त्या आमच्यापर्यंत कधी आल्या नाहीत.- भादन शिवा टोपले, वासिंद, शहापूरअटल सोलर योजनेने जीवनमान बदललेआज शेतकऱ्यांसाठी शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. त्या अनेक योजनांचा लाभ शेतकरी घेत आहेत. मी माझ्या शेतावर चार लाख रु पयांची ९५ टक्के सबसिडीची मुख्यमंत्री अटल सोलर योजना राबविल्याने मला शेतीला खूप फायदा झाला आहे. यामुळे माझे जीवनमान बदलले. मात्र या योजना तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून यामुळे शेतकºयांचा मोठा फायदा होईल. शेतकºयांना शासनाने या योजनांविषयी व्यवस्थित माहिती दिल्यास त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.- स्वामी विशे, तुटे, शहापूर.योजनांचा लाभ केवळ ठरावीक व्यक्तींनाचआज सरकारी योजना या केवळ राजकीय नेत्यांच्या जवळ असणाºया कार्यकर्त्यांनाच कळतात. आणि यात फायदा देखील त्यांचाच होतो. शेतकºयाला आपल्या शेतीत हमी भाव मिळत नसल्याने तो निराश आहे. शासनाने आणलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ मला आजपर्यंत मिळालेला नाही. वा त्याविषयी काही माहितीही कधी आम्हाला मिळाली नाही. शासन मोठमोठ्या करखान्यांना अनेक सवलती देऊन वारेमाप पैसे देते आणि ते माफ देखील करते. मात्र आम्हा शेतकºयांना ही सवलत मिळत नाही.- भाऊ पांढरे, तुटे, शहापूरहमी भाव न मिळाल्याने होतो मोठा तोटाशेतकरी शेती पिकवतो, मात्र त्याला ते धान्य विकताना हवा तसा हमी भाव मिळत नाही. त्यामुळे त्याचा मोठा तोटा होतो. हमीभाव मिळाल्यास त्याचा शेतकºयाला निश्चितच फायदा होईल. शेतकºयांना लागणारी औजारे, त्यासाठी असणाºया योजना या शेतकºयांपर्यंत पोहोचवायला हव्यात. मात्र अशा कोणत्याही योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, हेच आमचे दुर्दैव. आज तालुक्यातील कारखान्यांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात त्या मानेने शेतकºयांना मात्र अशा सवलती मिळत नाहीत.- अनंता मांजे, खरिवली, शहापूरसरकारकडून अपेक्षा कराव्यात तरी कोणत्या?शेतकºयांसाठी कोणत्या कोणत्या शासकीय योजना आहेत त्या त्यांनाही माहीत नसतात. माहीत असतात त्या केवळ राजकीय नेत्यांना. शासनाने अनेक प्रकारची खाती आम्हाला उघडायला सांगितली आहेत. आम्ही या खात्यात पैसे जमा करू असे सांगितले. रोजगार नसला तरी आम्ही तुम्हाला रोजगाराच्या रूपात पैसे जमा करू असे सांगितले. त्यामुळे आम्ही खाती उघडली. मात्र आजपर्यंत या आमच्या खात्यात एक रु पयाही जमा झालेला नाही. त्यामुळे या सरकारकडून आत कोणत्या अपेक्षा कराव्यात हाच मोठा विषय आहे.- बाळू धोंडू भोईर, लोनाड, शहापूर

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक