शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गोविंदा अन् राज ठाकरेंमुळे झालेल्या पराभवाने अस्वस्थ, राज्यपाल राम नाईक यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 02:47 IST

अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली.

- शशी करपेवसई : अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली.स्व. सुरेश जोशी स्मृती मंच आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेच्या संयुक्त विद्यमाने राम नाईक यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांना राम नाईक यांनी दिलखुलास उत्तरे दिली. रामभाऊंनी वडिलांचे संस्कार, संघाने लावलेली व्यायामाची आवड आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची सवय यामुळे आरोग्य आणि अ़नेक अडचणींचा सामना आयुष्यात करता आल्याचे सांगितले.जनसंपर्क, संघर्ष आणि सेवा ही आपल्या आयुष्याची त्रिसूत्री असून त्यामुळेच आपणाला आतापर्यंत भरभरून यश मिळत गेले. आपण कॅन्सरसारख्या विकारावर आत्मबल, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि जनतेच्या शुभेच्छा यामुळेच मात करून मृत्यूच्या दारातून परत आल्याची भावना त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली.कुष्ठरोग्यांना दिलेले अनुदान, अर्नाळा किल्ल्यातील मच्छिमारांना केलेला वीज पुरवठा, मनोरी गोराईला केलेला पाणी पुरवठा यांमुळे सर्वाधिक समाधान लाभल्याचे त्यांनी सांगितले.उत्तरप्रदेशात महाराष्ट्र दिसतो का? या प्रश्नावर त्यांनी कानपूर, अलाहाबाद, आग्रा, वाराणसी या शहरांमध्ये सोने गाळणारे कारागिर हे सांगली, साताºयातील आहेत. उत्तर प्रदेशाच्या राजभवनात महाराष्ट्र दिन साजरा करण्याची प्रथा आपण सुरु केली आहे. शिवनेरी ते शिवजयंती असा मोटार सायकलने प्रवास करून आलेल्या मावळ््यांनी लखनऊ भगवेमय केले. त्यामुळे निश्चित उत्तर प्रदेशातही महाराष्ट्र दिसून आला, असे त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेशात वीज, कायदा आणि सुव्यवस्था, उद्योगधंदे, व्यापार, नोकºया या समस्या आहेत. काम नसल्यामुळे लोक मुंबईतील झोपड्यांमध्ये दाटीवाटीने रहात आहेत. मात्र, त्यांच्या रोजगारासाठी उत्तर प्रदेशात गुंतवणूकदारांची बैठक घेण्यात आली. त्यात १ हजार ८५ गुंतवणूकदारांनी ४.२८ लाख कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे ४० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.मुलाखतीपूर्वी भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक यांनी रामभाऊंनी उत्तर प्रदेशचा उत्तम प्रदेश केला असे गौरवोद्गार काढले. जातीपातीच्या पलिकडे माणसाचा शोध घेणारे रामभाऊंचे व्यक्तीमत्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोमसापचे वसई शाखाध्यक्ष अनिल रोकडे यांनी स्वागत केले. हरेश्वर नाईक यांनी त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी तर आभार शेखर धुरी यांनी मानले. या दिलखुलास मुलाखतीमुळे अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.

टॅग्स :Ram Naikराम नाईकVasai Virarवसई विरार