शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

होळी पेटवून सरकारविरोधात केला शिमगा

By admin | Published: March 11, 2017 2:15 AM

जव्हार, मोखाडा आदी भागात रोहयो अंतर्गत पुरविण्यात आलेल्या कामाची तीन महिन्यापासून मजुरीच मिळाली नसल्याने स्थलांतर आणि कुपोषण रोखण्याचा बडेजाव

- हितेन नाईक,  पालघरजव्हार, मोखाडा आदी भागात रोहयो अंतर्गत पुरविण्यात आलेल्या कामाची तीन महिन्यापासून मजुरीच मिळाली नसल्याने स्थलांतर आणि कुपोषण रोखण्याचा बडेजाव मिरविणाऱ्या निष्क्रीय प्रशासनाच्या कारभाराचा आणि असंवेदनशील धोरणाचा निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पाच तहसीलदार कार्यालयावर आज "पोसद मोर्च्या"चे आयोजन करण्यात आले होते.पालघर जिल्ह्यातील आदिवासी दिवसेंदिवस दारिद्र्याच्या अंधारात लोटला जात असून त्यांच्या उदरिनर्वाहा साठी एकमेव पर्याय म्हणून रोजगार हमी योजने कडे पिहले जाते.शासन,प्रशासना कडून रोहयो अंतर्गत कामे काढली जात असल्याचे सांगितले जात असले तरी अल्प दर आणि वेळेवर न मिळणारा पगार ह्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील लोक नाईलाजाने शहरी भागात स्थलांतर करून मिळेल ते काम स्विकारीत आहेत.ह्या आदिवासी बहुल भागात कुपोषण नसून रोजगार हमी योजनेची कामे हि प्रभावी पणे राबवली जात असल्याचा डांगोरा शासन पिटत असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक मजुरांना डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 ह्या कालावधीत केलेल्या कामाचे आजही पैसे मिळालेले नाहीत.एकी कडे काम देऊनही मजुरी मजुरी देत नाही,तर दुसरी कडे कामाची मागणी करूनही काम दिले जात नाही. एकट्या विक्र मगड तालुक्यात 755 मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.आदिवासी समाजात होळीचा सणाला खूप महत्व असते अश्या वेळी चार मिहन्याचा पगारचा झाला नसल्याने हजारो कुटुंबावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. म्हणून सरकारला सुबुद्धी मिळावी, आणि ह्या भागातील भ्रष्टाचार, गैरकारभार, गरिबांची भूक, सरकारची असंवेदनशिलता होळीत भस्म व्हाव्यात ह्या साठी पालघर, विक्र मगड, जव्हार, मोखाडा व वाडा ह्या पाच तहसीलदार कार्यालया समोर होळी पेटवून आणि प्रतीकात्मक बाहुले बनवून निषेध व्यक्त करण्यात आला. ह्यावेळी स्वत: संस्थापक विवेक पंडित, सर्व तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांची निवेदने तहसीलदारांना दिले.