शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

वीज बील भरणा केंद्रे वाढवा; डहाणूतील किनाऱ्यालगतच्या ग्राहकांची मोठी गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 05:05 IST

डहाणू किनारपट्टी भागामध्ये वीज बील भरणा केंद्राची वानवा असल्याने तासंतास रांगेत उभे राहावे लागते. महावितरणने तत्काळ नवीन केंद्र उघडावे अन्यथा आंदोलनाचा सामना करावा असा पवित्रा किनारपट्टी भागातील ग्राहकांनी घेतला आहे.

बोर्डी : डहाणू किनारपट्टी भागामध्ये वीज बील भरणा केंद्राची वानवा असल्याने तासंतास रांगेत उभे राहावे लागते. महावितरणने तत्काळ नवीन केंद्र उघडावे अन्यथा आंदोलनाचा सामना करावा असा पवित्रा किनारपट्टी भागातील ग्राहकांनी घेतला आहे.वीज देयकात छापील मुदतीत वीज देयके भरणा न कळल्यास ग्राहकांना अधिभार सोसावा लागतो. शिवाय महावितरणचे कर्मचारी गृहभेटी देऊन देयकं भरा अन्यथा पुरवठा खंडीत करण्या बाबत सूचित करतात. मात्र, किनारपट्टीतील डहाणूगाव, नरपड, आगर, मल्याण अशा भागात वीज भरणा केंद्र नसल्याने ग्राहकांना मसोली येथील महवितरणच्या कार्यालयात जावे लागते. तेथे ग्राहकांची लांबच लांब रंगा असल्याने अनेक तास वाया जातात. काही वेळा एक दोन वेळा हेलपाटे मारल्यावर नंबर लागतो. त्यामुळे शारीरिक व आर्थिक दोन्हीचे नुकसान सोसावे लागते असे ग्राहकांचे म्हणणे आहे.या पुर्वी सुद्धा देयके सेतू कार्यालयात स्विकारली जायची, आता डहाणू जनता सहकारी बँकेच्या पूर्व शाखेत घेतली जातात. परंतु हे अंतर लांब असून दोन वेळा रिक्षा बदलावी लागत असल्याने ग्राहकांकरिता भुर्दंड पडत आहे.- किनारपट्टी भागात वीज बील भरणा केंद्र सुरु करण्याची मागणी सहा महिन्यापूर्वी उप अभियंते धोडी यांची भेट घेऊन केली होती. मात्र, त्या बाबत अद्याप ठोस पाऊल उचलण्यात न आल्याची खंत व्यक्त होत आहे. दरम्यान महावितरणने ग्राहकांच्या हिताचा विचार न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार