शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

भाताणे पुलाची उंची वाढवा!

By admin | Published: July 23, 2015 4:13 AM

सालाबादप्रमाणे यंदाही भाताणे येथील तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. दरवर्षी मुसळधार वृष्टी झाली की, हा पूल पाण्याखाली जातो

वसई : सालाबादप्रमाणे यंदाही भाताणे येथील तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. दरवर्षी मुसळधार वृष्टी झाली की, हा पूल पाण्याखाली जातो व पंचक्रोशीतील सुमारे २० ते ३० गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो. यंदा खानिवडे, बेलवाडी या भागातही पुराचे पाणी शिरल्यामुळे या सर्व गावांतील ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. उसगाव-भाताणे व सायवन-मेढे हा संपूर्ण परिसर काल पाण्याखाली गेला होता. या पुलाची उंची वाढविण्यात यावी, याकरिता या परिसरातील ग्रामस्थ सतत मागणी करत असतात. परंतु, त्याकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले.तानसा नदीच्या पात्रात प्रचंड रेतीउपसा होत असल्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती दरवर्षी निर्माण होत असते, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. या नदीकाठी असलेला रस्ताही उद्ध्वस्त झाला आहे. अनेकदा त्याची दुरुस्ती केल्यानंतरही रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ अशीच असते. काल झालेल्या पावसामध्ये भाताणे, नवसई, थळ्याचापाडा व अन्य २० ते २२ गावांतील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. पुराचे पाणी शिरल्यामुळे या सर्व गावांतील शेती उद्ध्वस्त झाली आहे.पूल बंद झाला की, ग्रामस्थ बेलवाडीमार्गे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच सायवन-मेढे रस्त्याने वजे्रश्वरी-शिरसाड मुख्य रस्त्यावर येत असत. परंतु, यंदा चहूबाजूने पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांना बाहेर पडण्याचे सर्व रस्ते बंद झाले. काल पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना आपत्ती निवारण पथकाने सुखरूप बाहेर काढले. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी या पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे. परंतु, शासनाचा संबंधित विभाग या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. मंगळवारी झालेल्या पावसानंतर पुराचा जोर इतका प्रचंड होता की, सकवार येथे एका महिलेचे घर पत्त्यासारखे कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)