शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
2
उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी'; ब्लॉकेज आढळल्यानं लगेचच शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
3
बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर
4
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडूची माघार
5
बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या
6
SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...
7
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात?; भाजपकडून लढण्यास इच्छुक
8
सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?
9
Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 
10
Video: Elon Musk चा मोठा कारनामा; जगातील सर्वात मोठ्या रॉकेटची यशस्वी लँडिंग
11
“हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका”; आता काँग्रेस आमदाराची मागणी, पण कारण काय?
12
आत्मविश्वासाची कमी अन् ऑस्ट्रेलियाची भीती; पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती
13
"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा
14
महायुतीच्या घोषणांना काँग्रेस जोरदार उत्तर देणार; महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात ३ मोठी आश्वासने असणार?
15
पृथ्वी शॉ,अजिंक्य अन् अय्यरचा फ्लॉप शो; पांड्याच्या संघानं मुंबईला दिला पराभवाचा धक्का!
16
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर; चांदीची चमकही वाढली; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर 
17
4G, 5G नंतर, भारत आता 6G च्या शर्यतीत, टॉप 6 देशांमध्ये मिळवले स्थान
18
म्हणून आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी राजकुमार राव करतो उपवास! कारण ऐकून थक्क व्हाल
19
इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेणार नाही; CM एकनाथ शिंदेंचा इशारा
20
टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा

अग्निशमन केंद्रात मनुष्यबळ वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:56 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील अग्निशमन केंद्रात पुरेसे मनुष्यबळ तसेच वाहनांची संख्या अपुरी असल्याने येथील वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात ते तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित येथील केंद्रात पुरेशा मनुष्यबळासह वाहने उपलब्ध करुन द्यावीत

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील अग्निशमन केंद्रात पुरेसे मनुष्यबळ तसेच वाहनांची संख्या अपुरी असल्याने येथील वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात ते तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित येथील केंद्रात पुरेशा मनुष्यबळासह वाहने उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी पालिकेकडे केली आहे.पालिकेची भार्इंदर पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व सिल्वर पार्क येथे प्रमुख अग्निशमन केंद्रे आहेत. याखेरीज उत्तन येथील पाण्याच्या टाकीजवळील एका खोलीत तसेच नवघर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये पर्यायी अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. अग्निशमन दलात एकूण ९ मोठे व २ मिनी फायर व वॉटर टेंडर अशा एकूण ११ बंबगाड्या, १ रेस्क्यु व्हॅन, २ वॉटर टँकर, १ टिटीएल (टेबल टर्न लॅडर), १ रूग्णवाहिका तैनात ठेवल्या आहेत. ते हाताळण्यासाठी एकूण ८२ अधिकारी व कर्मचारी तीन पाळ्यांत काम करतात.उत्तनच्या अग्निशमन केंद्रात प्रत्येक पाळीत १ लिडींग फायरमन, २ फायरमन, १ फायरमन कम ड्रायव्हर, १ कंत्राटी ड्रायव्हर असे एकूण ६ अधिकारी व कर्मचारी असतात. या केंद्रासाठी पूर्वी एक मिनी फायर व वॉटर टेंडर वाहन दिमतीला दिले जात होते. सध्या १ मोठे वाहन दिले आहे. या केंद्राजवळच घनकचरा प्रकल्प असून अनेकदा आगीच्या घटना घडतात.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक