शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
3
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
4
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
5
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
6
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
7
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
8
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
9
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
10
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
11
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
12
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
13
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
14
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
15
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
16
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
17
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
18
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

सर्पदंशामुळे जिल्ह्यातील मृत्यूचे वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:10 AM

दहा महिन्यात नऊ जण दगावले

हितेंन नाईक/अनिरुद्ध पाटीललोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यात मागील दहा महिन्यात सर्पदंशाने नऊ जण दगावले आहेत, तर एकाला विंचूदंशाने प्राण गमवावा लागला आहे. गत तीन वर्षांत सर्पदंशाने सतरा जणांचा आणि तिघांचा विंचूदंशाने मृत्यू झाल्याची नोंद पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील आहे. पालघर जिल्ह्यातील सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अधिवासाची ठिकाणे विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या नानाविध प्रकल्पांच्या कामामुळे उद्ध्वस्त होत असून, नवीन वास्तव्याच्या शोधार्थ साप, विंचू आदी विषारी सरपटणारे प्राणी मानवी वस्तीच्या जवळ येत आहेत. तसेच हवेतली उष्णताही वाढत चालली असून, त्यापासून बचाव करण्यासाठी नेहमी रात्री बाहेर पडणाऱ्या प्राण्यांच्या हालचाली आता दिवसाढवळ्याही वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीणबहुल भागात सर्पदंश, विंचूदंशाचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून आले आहे. शेतामध्ये, घराच्या आडोशाला, रस्त्यात चालताना अंधारात पाय पडल्याने हे दंश होत आहेत. सर्पदंशामुळे गेल्या तीन वर्षांत उपचारादरम्यान हे १७ जण दगावले आहेत. या प्रकारे मृत्यू होऊनही नोंदी न झाल्यामुळे ही आकडेवारी आणखी वाढू शकते. पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षी सर्वाधिक सर्पदंशाने चार मृत्यू हे डहाणू तालुक्यातील कासा रुग्णालयात झालेले आहेत. तर जव्हार रुग्णालयात तीन आणि मनोर रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत प्रत्येकी चार मृत्यू झाले असले तरी त्या तुलनेत या वर्षी मृत्यू झाल्याचा आकडा वाढला आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंत नऊ जण दगावले आहेत.

सर्प-विंचूदंश झाल्यानंतर दंश झालेल्या व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जाते. तिथे प्राथमिक उपचार किंवा दंशाची लस देऊन पुढे उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात येते. बहुतांश वेळेला सर्पदंश झाल्यानंतर प्राथमिक उपचाराचे सखोल ज्ञान अथवा योग्य औषधोपचार मिळण्यास उशीर होत असल्याने त्या व्यक्तीवर उपचार करणे शक्य होत नाही. परिणामी, उपचारांमध्ये गुंतागुंत निर्माण होत असल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागतो.

गतवर्षी दोन हजारांहून अधिक नागरिकांना सर्पदंश गेल्या वर्षी दोन हजारांहून अधिक जणांना सर्पदंश झाले होते. २०१९-२० साली तीन हजारांच्या जवळपास तर २०१८-१९ साली तीन हजारांहून अधिक जणांना सर्पदंश झाले होते. या वर्षी २२३ जणांना विंचूदंश, गेल्या वर्षी ४५२ जणांना व १८-१९ मध्ये ३९३ जणांना विंचूदंश झाले आहेत. त्यामुळे या मृत्यूच्या घटनांमध्ये कमतरता आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखताना अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळतील, अशी व्यवस्था उभारणे गरजेचे बनले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारsnakeसाप