शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

जव्हार तालुक्याचे बीएसएनएल कार्यालय झाले भंगार

By admin | Published: December 25, 2016 12:15 AM

येथील बी.एस.एन.एल. कार्यालयाची अक्षरश: भंगार अवस्था झाली असून गेल्या २५ वर्षापासून जुन्या यंत्रणेलाच थिगळे लाऊन काम भागवले जाते आहे. या भंगार यंत्रणांद्वारे

- हुसेन मेमन,  जव्हार

येथील बी.एस.एन.एल. कार्यालयाची अक्षरश: भंगार अवस्था झाली असून गेल्या २५ वर्षापासून जुन्या यंत्रणेलाच थिगळे लाऊन काम भागवले जाते आहे. या भंगार यंत्रणांद्वारे काम करणे येथील कर्मचाऱ्यांचा मोठे जिकरीचे होत आहे. त्यात जव्हार येथील जे.टी.ओ.कडेच जव्हार, मोखाडा व विक्रमगडचा पदभार असल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच रिक्तपदांचा आकडा जास्त असल्यामुळे कामे कूर्मगतीने होत आहेत. एकविसाव्या शतकात डिजीटल यंत्रणा आल्या असून वायफाय (विनातार) पध्दतीने दूरसंचाराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, जव्हारमध्ये आजही २५ वर्षापूर्वीच्या यंत्रांना दुरूस्त करून कशीबशी चालविली जात आहे. येथील यु.पी.एस.च्या बॅटऱ्या पूर्णपणे निकाम्या झाल्यामुळे वीज गेल्यावर यंत्रणा बंद पडत असून परिणामी संपूर्ण सेवा कोलमडत आहे. कार्यालयात पहाणी केली असता बॅटऱ्यांना अन्य दोन बॅटऱ्या जोडून यू.पी.एस. दहा मिनिटे कसेबसे चालेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडे वर्षानुवर्षे पत्रव्यवहार करूनही कुठलीच नविन यंत्रणा दिली जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच वरीष्ठ विभागात कुठलेही प्रकरण गेले तरी त्याबाबतचे उत्तर महिना दोन महिना झाल्याशिवाय येत नाही. त्यानंतरच मिळतो नवीन फॉर्मनव्याने टेलीफोन कनेक्शन हवे असेल तर पहिले त्या भागात लाईन उपलब्ध आहे की, नाही याचा शहानिशा केली जाते. त्या नंतरच नविन कनेक्शन फॉर्म स्वीकारला जात आहे. गेल्या २५ वर्षापासूनम्हणजे कार्यालयाच्या जन्मापासून लावण्यात आलेल्या जिर्ण दूरसंचार यंत्राणांवरच काम सुरू आहे. जमिनी खालून गेलेल्या कॉपर केबलचा अक्षरश: चुरा झालेला असून ठिकठिकाणी जॉर्इंट मारून काम रेटले जात आहे. कल्याण एक्स्चेंजद्वारे चालतो कारभारजव्हारचे कार्यालय हे कल्याण एक्स्चेंजद्वारे चालविले जाते, त्यामुळे जव्हार ते कल्याण मध्ये कुठेही लाईन ब्रेक झाली की, जव्हारची यंत्रणा ठप्प होते. ब्रॉडबॅन्ड सेवाही बंद पडल्यास तिला पूर्ववत होण्यासाठी तीन चार दिवस लागतात. देयक मात्र पूर्ण महिन्याचे भरावे लागत असल्यामुळेही ग्राहकांत तीव्र नाराजी पसरली आहे.