शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

भाईंदरच्या जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात, महापालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 2:53 PM

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकिय सेवा मिळावी

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या व सद्या शासना कडे तीन महिन्यासाठी नियोजन दिलेल्या भाईंदरच्या पंडित भिमसेन जोशी रुग्णालयाचेच आरोग्य बिघडलेले आहे. विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या पाईपातुन सांडपाणे वहात असुन ते पिण्याच्या पाण्याच्या टाकी जवळ साचले आहे. सदर टाकी देखील उघडी असुन सांडपाणी व दुर्गंधी मुळे रुग्णांसह कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकिय सेवा मिळावी आणि खाजगी रुग्णालयाच्या मनमानी लूटमारीतुन सुटका मिळावी म्हणुन तत्कालिन जनता दलाचे नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचीका केली होती. न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि सत्ताधारायांना रुग्णालय बांधुन ते सुरु करणे भाग झाले. २०० खाटांचे सदर रुग्णालय असले तरी पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थे मुळे आजही शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग, आवश्यक डॉक्टर व यंत्रणाच उपलब्ध झाली नाही. यातुनच रुग्ण दगावण्याचे तसेच रेल्वेत बाळंत होण्याचे प्रकार घडले. या शिवाय विविध प्रकरणांनी सदर रुगणालय नेहमीच वादग्रस्त राहिले.रुग्णालय सक्षमपणे चालवण्या ऐवजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ते शासनाच्या माथी मारण्याचा खटाटोप सतत केला. तर शासना कडुन देखील पालिकेने आवश्यक बाबींची पुर्तता केली नाही म्हणुन रुग्णालय घेतले नाही. अखेर तीन महिन्यात पालिका सर्व प्रलंबित कामे करुन देईल या अटीवर केवळ व्यवस्थापन शासनाच्या आरोग्य विभागाने घेतले आहे. तर बाकी सर्व सुविधा, कर्मचारी पुरवणे, देखभाल आदी जबाबदारी पालिकेचीच आहे.परंतु पालिकेच्या ढिसाळ आणि उदासीन कारभारा मुळे जोशी रुग्णालयाच्या व्यथा काही संपता संपत नाहित. रुग्णालयाच्या स्वच्छतागृहाचे पाईप गळत असल्याने रुग्णालय परिसरात सांडपाणी साचुन आहे. सदर सांडपाण्या मुळे दुर्गंधी पसरली असुन डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यातच रुग्णालयाच्या पिण्याच्या पाण्याची टाकी येथे आहे. सदर टाकीचे झाकण तर नेहमीच अर्धवट उघडे असते. त्याभोवती सांडपाण्याचे तळे साचलेले आहे.सांडपाण्या मुळे दुर्गंधी व डासांच्या त्रासाने रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचारी, येणारे नागरिक व परिसरातील रहिवाशी देखील ग्रासले आहेत. त्यातच पाण्याची टाकी देखील सांडपाण्याच्या विळख्यात आल्याने रुग्ण आदिंना होणारा पाणी पुरवठा सुध्दा सुरक्षित राहिलेला नाही. गेल्या काही महिन्यां पासुन सांडपाण्याची गळती, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असताना देखील महापालिका प्रशासनाने या कडे डोळेझाक चालवली आहे.आपापली पालिकेतील दालनं नागरीकांच्या पैशां मधुन आलिशान करुन घेण्यात स्वारस्य असणाराया प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे रुग्णालयातील सांडपाणी आणि स्वच्छता राखण्या कडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांनी बोलुन दाखवला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरVasai Virarवसई विरारMumbaiमुंबई