शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

जिल्ह्यात भूमाफियांची दादागिरी

By admin | Published: July 28, 2015 11:33 PM

माहिम ग्रामपंचायत क्षेत्रातील चिंतू पाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारत संकुल उभारताना नैसर्गिक नाले तसेच ओढे बंद केल्याने ९० ते ९५ आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी

पालघर : माहिम ग्रामपंचायत क्षेत्रातील चिंतू पाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारत संकुल उभारताना नैसर्गिक नाले तसेच ओढे बंद केल्याने ९० ते ९५ आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी शिरून अन्नधान्य, विद्यार्थ्यांची पुस्तके, कपडे, भिजून मोठे नुकसान झाले आहे. नियम व कायदे पायदळी तुडवून भूमाफीयांची दादागिरी सुरू असून बिल्डरांच्या विरोधात तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांसह आदिवासी एकता परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बिल्डरांवर कारवाईची मागणी केली.पालघर शहरात गोठणपुर, वीरेंद्रनगर, डुंगीपाडा, घोलवीरा, चिंतूपाडा, माहिमरोड इ. भागात काही बिल्डरांनी नैसर्गिक नाले बंद करून अथवा लांबी कमी करून नैसर्गिक प्रवाह बदलल्याने या भागातील गरीबांच्या अनेक घरात ३ ते ४ फुट पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. यावेळी पालघर अग्निशमन दलाने स्थानिकांच्या मदतीने ४० ते ४५ लोकांची सुखरूप सुटका केली होती. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावरील चिंतूपाडा येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स उभारणाऱ्या एका बिल्डराने अनेक वर्षापूर्वीचा वहिवाटीचा रस्ता व तेथून वाहणारे नैसर्गिक नाले व ओढे बंद केल्याने पाण्याचा निचरा न होता अनेक घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते व पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक संकटावर मात करून लहान मुलांचे जीव वाचविण्यात लोकांना यश आले. लक्ष्मी कॉम्प्लेक्सला स्थानिकांचा विरोध असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बिल्डरने आपले काम सुरूच ठेवले असून प्रशासन कारवाई करीत नसल्याने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी एकता परिषदेचे गोपिनाथ चाकर, शकुंतला तांडेल, किर्ती वरठा, अमोल रावते यांनी कारवाईची मागणी केली. (वार्ताहर)