शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

वसई विरारमध्ये बत्ती गुल

By admin | Published: July 15, 2015 11:45 PM

वसई-विरार परिसरात वीज वितरण व्यवस्थेचा खेळखंडोबा अद्याप थांबलेला नाही. मंगळवारी या दोन्ही परिसरात सुमारे २२ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता.

वसई : वसई-विरार परिसरात वीज वितरण व्यवस्थेचा खेळखंडोबा अद्याप थांबलेला नाही. मंगळवारी या दोन्ही परिसरात सुमारे २२ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. विरार पश्चिम भागात सकाळी गेलेली वीज सायंकाळी ७ वाजता आली तर पूर्व भागात रात्री १२ वाजता गेलेली वीज सकाळी ७ वाजता आली. वीज खंडीत होण्यामागची कारणे एकाही कार्यालयाकडून कळू शक ले नाहीत.गेला महिन्या भरा पासून वसई विरार भागात सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरीक कंटाळले आहेत तर दुसरीकडे शासकीय कार्यालये, शाळा, हॉस्पिटल आदींवर परिणाम जाणवू लागला आहे. दोन आठवड्यापुर्वी सतत खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे बोळींज येथे गावकरी रस्त्यावर उतरले होते. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.या संदर्भात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई उपविभागाचे अधिक्षक अभियंता सोनावणे यांच्याशी संपर्क साधून त्वरीत कार्यवाही करा अन्यथ: उद्रेक होण्याची शक्यता आहे असे कळवले होते. त्यानंतरही वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही. उलट वीज खंडीत होण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत गेली. नालासोपारा येथे खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नगरसेवकांनी एकत्र येऊन अधिक्षक अभियंता कार्यालयावर हल्लाबोल केला होता. परंतु त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही.सहा दिवस मेट गाव अंधारातवाडा तालुक्यातील मेट येथे असलेल्या विद्युत राहित्रात बिघाड झाल्याने मेट या गावपाड्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महावितरणला कळवून सुद्धा वीज न आल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीची पाणी योजना बंद असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणी अशुद्ध असल्याने साथीचे आजार होण्याची भीती गावकरी व्यक्त करीत आहेत.