शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

गत वर्षात महाराष्ट्रात ८८ पत्रकारांवर हल्ले

By admin | Published: January 09, 2017 6:15 AM

पत्रकारांसाठी २०१६ हे वर्ष सर्वात वाईट, धोकादायक ठरले असून या वर्षात राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या ७९ घटना घडल्या असून

विक्रमगड : पत्रकारांसाठी २०१६ हे वर्ष सर्वात वाईट, धोकादायक ठरले असून या वर्षात राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या ७९ घटना घडल्या असून यामध्ये ८८ पत्रकार जखमी झाले आहेत. सरासरी दर चार दिवसाला राज्यात एका पत्रकारावर हल्ला झाल्याचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे संकलित झालेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे. १ जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१६ या पाच वर्षांच्या काळात राज्यात ३४१ पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. हे प्रमाण अन्य कोणत्याही राज्यांच्या तुलनेत जास्त आणि चिंता वाटावी एवढे आहे. आणखी किती पत्रकारांची डोकी फुटल्यावर सरकार पत्रकार संरक्षण कायदा करणार आहे? असा सवाल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी केला आहे. २०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यात ८८ पत्रकार जखमी तर झाले आहेतच त्याचबरोबर राज्याच्या वेगवेगळ्या भागातील पत्रकारांना धमक्या देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल्याच्या २४ घटना घडलेल्या आहेत. शिवाय पत्रकारांवर अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, सारखे गंभीर आणि अजामिनपात्र खोटे गुन्हे दाखल करण्याच्या २२ घटना घडल्या आहेत. याच कालावधीत एका पत्रकाराचे अपहरण झाले असून त्याची नोंद पोलिसात झालेली आहे. वेगवेगळ्या कारणांनी ६ पत्रकारांनी आत्महत्या केल्या असून १४ पत्रकारांचे अकाली निधन झाले आहे. माध्यमातील या सर्व घटना माध्यमात काम करणाऱ्यसाठी चिंता वाढविणाऱ्या आहेत.समितीने २०१२ पासूनची आकडेवारी दिलेली आहे. २०१२ मध्ये पत्रकारांवरील हल्ल्याच्या ४५ घटना घडल्या. २०१३ मध्ये त्यात मोठीच वाढ होऊन ती संख्या ६५ पर्यंत पोहोचली. २०१४ मध्ये पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले नाही. उलट ते वाढले. २०१४ मध्ये ६६ पत्रकारांवर हल्ले झाले. २०१५ मध्ये हा आकडा आणखी वाढला आणि हल्ल्यांची संख्या ७७ वर पोहोचली तर २०१६ मध्ये ८८ पत्रकार जखमी झाले. (वार्ताहर)