शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

पालघरच्या जंगलातील वणवे मानवनिर्मित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:44 PM

पर्यावरणरक्षकांकडून कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर, ठाणे जिल्ह्यांतील डोंगराला एकाच आठवड्यात अनेक ठिकाणी लागलेले वणवे मानवाने लावले असल्याने या मागच्या षड् यंत्राचा शोध वनविभाग पोलिसांनी लावून वनपरिक्षेत्र आणि त्यावर सहवास करणाऱ्या जीवांना उद्ध्वस्त करणाऱ्याविरोधात कडक कारवाईची मागणी पर्यावरणरक्षकांकडून केली जात आहे. वनपरिक्षेत्रातील प्लॉट मोकळे व्हावे, कोळशाची उपलब्धता व्हावी, तसेच शिकार करता यावी, आदी अनेक कारणांसाठी जंगलात वणवे लावले जात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याला २४ हजार हेक्टर क्षेत्राची वनसंपदा लाभली असून अनेक दुर्मीळ जातीचे, वनौषधीचे वृक्ष असून जवळ असलेल्या कोहोज किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने करण्यात आलेली वृक्षारोपणातील झाडे नुकत्याच लागलेल्या आगीत नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मनोर, विक्रमगड, सफाळे तर ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी, पडघा, कुहे, चिंबीपाडा, दिघाशी, कांबा आदी भागांतील वनपरिक्षेत्रात वणवे लावण्याचे प्रकार एकापाठोपाठ घडत आहेत. हे वणवे मानवनिर्मित असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात असून या मागच्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी प्रो. भूषण भोईर यांनी केली आहे. 

पालघर, ठाणे जिल्ह्यांच्या अनेक वनक्षेत्रांत बिबटे, रानडुक्कर, मोर, ससे, माकडे आदी प्राणी-पक्ष्यांचा सहवास असून या आगीमुळे त्यांच्या अधिवासाची ठिकाणे नष्ट होणार आहेत. मागच्याच आठवड्यात ९ मार्चला पालघरजवळील चहाडे, लालठाणे येथील डोंगरावर वणवा लावण्यात आला होता. 

डोंगरावर अनेक भागांत लागलेल्या आगींवरून हा वणवा मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होत आहे. या आगीतून निर्माण होणारा कोळसा शहरात विकला जात आहे. यासंदर्भात वनविभाग गंभीर नसल्याचे निदर्शनास येत असून त्यांची गस्ती पथके याआगी लावण्याच्या प्रकारांना आळा घालण्यास अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरfireआग