शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

हरवलेले दाग-दागिने पोलिसांमुळे अवघ्या ६ तासात सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 21:42 IST

पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईमुळे ६ तासात सापडले चोरीस गेलेले दाग-दागिने 

मुंबई - मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून नालासोपारा येथे आलेल्या बलवीर शिकरवार (वय - ३६) यांच्या हरवलेल्या बागेतून हॉटेलातील कर्मचाऱ्याने लंपास केलेले दाग- दागिने ६ तासात पोलिसांनी शोधून काढले. माणिकपूर पोलिसांनी केलेली हि यशस्वी कारवाई आहे. 

काल ग्वाल्हेरहून आलेल्या सामानसोबत असलेली बलवीरची नेव्ही ब्लु रंगाची बॅग नवघर येथील साईनाथ हॉटेलबाहेरील पार्किंगच्या ठिकाणी राहिली होती. सायंकाळी ७ च्या सुमारास इन्होवा गाडीकडे बलवीर हे सामानाचे लगेज घेऊन नालासोपाऱ्यातील घरी निघाली. घरी गेल्यावर बलवीर यांच्या लगेजमध्ये सोन्या - चांदीचे दागिने असलेली नेव्ही ब्लु रंगाची बॅग सापडली नाही. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या, सोनसाखळी, कानातले, अंगठ्या आणि चांदीचे पैंजण आदी दागिने होते. एकूण ५ लाख ४ हजार ४३० रुपयांचे हे दागिने होते. साईनाथ हॉटेलबाहेरील पार्किंगच्या ठिकाणी बलवीरने पुन्हा जाऊन बॅगचा शोध घेतला असता त्याला रिकामी बॅग आढळून आली. बलवीरला दागिने आता मिळणार नाहीच असे वाटले होते.  हताश झालेल्या बलवीरने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बॅग शोध घेण्यासाठी साईनाथ हॉटेलजवळील फेरीवाले, रिक्षावाले यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी वीरेंद्रकुमार छोटूलाल भरती (वय - ३०) या हॉटेलमध्येच काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे हरवलेले दागिने सापडले असून पोलिसांनी केवळ ६ तासात हे हरविलेले दागिने बलवीरला शोधून दिले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrimeगुन्हाRobberyदरोडा