शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुलाची दोन लग्न, पत्रातील माफी अन्...; वसईतील मेहता पिता-पुत्राच्या मृत्यूची इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 19:27 IST

गेल्या महिन्यात भाईंदर रेल्वे स्थानकात पिता-पुत्राने रेल्वेखाली उडी मारुन जीव दिला होता.

Bhayandar Father-son Death : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ जुलै महिन्यात पिता पुत्राने धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. ८ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पिता पुत्राने धावत्या ट्रेनखाली उडी घेतल्याने दोघांचाही मृत्यू झाला होता. सुरुवातीला शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याने दोघांनी आयुष्य संपवले असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र कुटुंबियांनी हा दावा फेटाळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली. तपासानंतर आता या प्रकरणाचे गूढ उकललं आहे.

हरिष मेहता (६०) आणि जय मेहता (३०) हे ८ जुलै रोजी सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकात आले होते. फलाट क्रमांक सहावरून खाली उतरून ते मीरा रोडच्या दिशेने रेल्वे रुळांवरून चालत गेले. त्यानंतर काही अंतरावरच लोकल ट्रेनने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होतं होतं.  हा सगळा प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. मात्र दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण पुढं आलं नव्हतं. महिन्याभरानंतर आता वसईतील मेहता पिता पुत्रांच्या या आत्महत्येचे गूढ अखेर उकलले आहे.

हरिष मेहता हे नैराश्याने ग्रस्त होते. तर जय मेहता याने अन्य धर्मीय मुलीशी लग्न केले होते. आंतरधर्मीय विवाहामुळे जय मेहता त्रस्त झाला होता आणि त्याची पहिली पत्नी त्याला बदनाम करण्याची धमकी देत ​​होती. या कारणांमुळेच दोघांनी आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे रेल्वे पोलिसांनी म्हटलं आहे. जय मेहताचा मोबाईल फोन, त्याच्या कार्यालयात सापडलेली डायरी तसेच त्याची पहिली पत्नी आणि दुसर्‍या पत्नीच्या जबानीतून या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

जय मेहता याचे एका मुस्लिम तरुणीशी गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी प्रतित्रापत्राद्वारे लग्नही केले होते. मात्र आपला समाज मुस्लिम तरुणीला स्वीकारणार नाही म्हणून जयने तिला अंधारात ठेवून एका दाक्षिणात्य मुलीशी प्रेमविवाह केला होता. जयच्या पहिल्या पत्नीला ही बाब समजल्यानंतर तिने याबाबत जाब विचारला आणि दुसऱ्या पत्नीला सोड असा दबाव टाकायला सुरुवात केली. इकडे, दुसर्‍या पत्नीलाही जयच्या पहिल्या लग्नाबाबत समजल्याने त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे हे प्रकरण लोकांना समजल्यास आपली बदनामी होईल अशी भीती मेहता पिता पुत्रांना वाटत होती. त्यामुळे दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वेखाली उडी घेतली, अशी माहिती वसई रेल्वे पोलिसांनी दिली.

दरम्यान, रेल्वे पोलिसांना तपासात जय मेहताच्या मरोळ येथील ऑफिसमध्ये एक डायरी सापडली होती. या डायरीमध्ये त्याने दोन्ही पत्नींना उद्देशून  एक माफीचे पत्र लिहीले होते. जयने पत्रातून दोन्ही पत्नीची माफी मागितली होती. पोलिसांना जयच्या मोबाईल मधील सीडीआर आणि डायरीतून आणखी माहिती देखील मिळाली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीbhayandarभाइंदरPoliceपोलिस