शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

नालासोपारा-ठाणे प्रवास २ तासांचा

By admin | Published: December 26, 2016 5:56 AM

नालासोपारा-ठाणे विना वाहक वाहतूक करण्याचा एसटीचा निर्णय फुकट्या प्रवाशांचा पथ्यावर पडला असून, तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांच्या त्रासात मात्र भर पडली आहे.

वसई : नालासोपारा-ठाणे विना वाहक वाहतूक करण्याचा एसटीचा निर्णय फुकट्या प्रवाशांचा पथ्यावर पडला असून, तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांच्या त्रासात मात्र भर पडली आहे. तर दीड तासाचा प्रवास दोन तासाचा झाला आहे. नालासोपारा-ठाणे एसटी वाहतूक दर अर्ध्यातासाच्या अंतराने सुरु आहे. भरगच्च प्रवासी असलेल्या या फेऱ्यांमधून चांगला नफा होत असला तरी प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याऐवजी त्रासच होत आहे. याकडे आगार व्यवस्थापकांचे लक्ष नाही. या मार्गावरील गाड्यांमध्ये असलेले वाहक हटवण्यात आले आहेत. नालासोपारा डेपोत ठाणे गाडी लागल्यावर आतील सर्व प्रवाशांची तिकीटे काढण्याचे काम वाहकाकडून केले जाते. त्यानंतर वाहकाला उतरवून विनावाहक फेरी सुरु होते.तुळींज, वर्तक टॉवर, संतोष भवन,बिलालपाडा अशा चार थांब्यावरील प्रवासी घेतल्यानंतर पेल्हार फाट्यावर एसटी थांबवण्यात येते. त्या ठिकाणी उभा असलेला वाहक बसमध्ये चढून उर्वरीत प्रवाशांची तिकीटे काढतो. त्यानंतर पुन्हा विना वाहक प्रवास सुरु होतो. वसई फाटा, बर्माशेल, तुंगारेश्वर, कामण फाटा अशा महामार्गावरील थांब्यावर प्रवाशांची चढ उतार झाल्यानंतर एसटी ठाण्याच्या मार्गाला लागते. या सर्व थांब्यादरम्यान वाहक नसल्यामुळे अनेक फुकटे प्रवासी आपल्या इच्छित स्थळावरून विनातिकीट प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विनावाहक फेऱ्यांमधून एसटीचे नुकसान होऊ लागले आहे. पूर्वी नालासोपारा-ठाणे हा प्रवास दिड तासाचा होता. वाहक एसटीतच असल्यामुळे वेळ न दवडता गाड्या धावत होत्या. या धावत्या गाडीतच तिकीटे काढली जात होती. तिकीटे काढणारा वाहक गाडीतच शेवटपर्यंत असल्यामुळे कोणत्या प्रवाशाने तिकीट घेतले नाही. कोणत्या प्रवाशाने कुठले तिकीट घेतले. कोणाला कुठे उतरायचे आहे. याची त्याला माहिती असायची त्यामुळे प्रवासादरम्यानचा वेळही वाचत होता आणि फुकट्या प्रवाशांनाही चाप बसत होता. एखाद्या नवख्या प्रवाशाला इच्छितस्थळी उतरण्यासही मदत होत होती. (प्रतिनिधी)