शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Published: January 10, 2017 5:34 AM

रिझर्व्ह बँकेनी जिल्हा सहकारी बँकांवर घातलेल्या अनेक निर्बंधामुळे ग्रामीण सहकारी संस्था, पतपेढ्याचा व्यवहार ढासळला

पालघर : रिझर्व्ह बँकेनी जिल्हा सहकारी बँकांवर घातलेल्या अनेक निर्बंधामुळे ग्रामीण सहकारी संस्था, पतपेढ्याचा व्यवहार ढासळला असून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न झाल्याने त्यांना लागवडी पासून वंचित राहावे लागत असल्याच्या निषेधार्थ आज पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.पंतप्रधान मोदींनी ८ नोव्हेंबर रोजी पाचश व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर कोलमडलेली अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी त्यांनी ५० दिवसांचा कालावधी जनते कडून मागितला होता. मात्र आज ६१ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतरही चलन तुटवड्याची गंभीर परिस्थिती कायम आहे. रिझर्व्ह बँकेने ग्रामीण भागातील गरीब जनतेची बँक समजल्या जाणाऱ्या सर्व सहकारी जिल्हा बँका, पतपेढ्या यांच्या व्यवहारावर अनेक निर्बंध घातल्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. शेतकऱ्यांना चलन तुटवड्या मुळे कर्जाची रक्कम वेळेवर मिळू न शकल्याने त्यांना रब्बीहंगामा पासून वंचित रहावे लागले आहे.कोणतीही पूर्व तयारी न करता घाईघाईनी नोटाबंदी घोषित केल्याचा परिणाम देशातील कोट्यवधी जनता भोगीत आहे.त्यामुळे जनतेला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या आणि तिला आणीबाणी सदृश्य परिस्थिती मध्ये लोटणाऱ्या भाजपा सरकारचा ह्यावेळी निषेध करण्यात आला. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेले आंदोलन आचारसंहितेच्या कारणाने रद्द करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक संजय वढावकर, सरचिटणीस अनिल गावड,तालुकाध्यक्ष सुभाष पाटील,दामोदर पाटील,महिला जिल्हाध्यक्ष निलम राऊत,मकरंद पाटील, नगरसेवक सचिन पाटील,विरेन्द्र पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादरकेले. (प्रतिनिधी)