शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 18:04 IST

पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.

हितेंन नाईक -पालघर- पालघरच्या वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला अखेर यश आले. रात्री मुसळधार पावसाचा कमी झालेला जोर आणि समुद्राला लागलेल्या ओहोटीमुळे नदीचा प्रवाह कमी झाल्याने एन डी आरएफच्या टीमचे काम सुलभ झाले आणि १६ तासापासून नदीच्या प्रवाहात अडकून पडलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.

मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षभरापासून सुरू असून ह्या कामाचा ठेका घेतलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरने मोठा प्रोजेक्ट् बहाडोली गावात उभारला आहे. बहाडोली गावाच्या पूर्वेला असलेल्या वैतरणा नदीत पूल उभारण्यासाठी पिलर उभारण्याचे काम, मुसळधार पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असताना ही धोकादायक रित्या सुरूच होते. कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना जीएम कंपनीच्या व्यवस्थापकांनी १० कामगारांना नदीच्या धोकादायक प्रवाहात लोटून दिले होते.

जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी-नाल्याना पूर आला असून अनेक लोक अडकून पडले आहेत. जिल्ह्यातील अनेक धरणे भरली असून त्यातून लाखो क्युमेंक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. अशा वेळी कामगारांच्या जीविताची काळजी न घेता त्यांना धोकादायक परिस्थितीत नदीत उतरविण्याची जोखीम ह्या १० कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरली होती.

बुधवारी रात्री मुंबईच्या कोस्ट गार्डकडे नदीत फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मागितलेली मदत मुसळधार पाऊस, रात्रीची घटना आणि नदीच्या धोकादायक प्रवाहामुळे शक्य नसल्याचे कोस्टगार्डने कळविले होते. दुसरीकडे एन डी आरएफकडे असलेल्या साधन सामग्रीच्या मर्यादा लक्षात घेता रात्रभर सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडत होते. स्थानिक मच्छीमाराच्या बोटीची मदत ही धोकादायक परिस्थिती मुळे उपलब्ध होऊ शकत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनिल शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी ह्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले. ह्यावेळी स्थानिक पोलिसांचे सहकार्य ही महत्वपूर्ण ठरले. 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल