शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

उपप्रदेशातील कृषी क्षेत्र वाचविणे गरजेचे

By admin | Published: June 08, 2015 4:27 AM

उपप्रदेशामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दीपक मोहिते, वसईउपप्रदेशामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उपप्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे १२ ते १५ जूनदरम्यान पावसाला सुरूवात होते. हा अनुभव लक्षात घेऊन शेतकरी शेतीच्या कामाला सुरूवात करतात. परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाचे चक्र बदलले आहे. जूनमध्ये हजेरी लावणारा पाऊस मध्येच गायब होतो व तो पुन्हा जुलैच्या मध्यास येतो. त्यामुळे पेरलेले बियाणे व खताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशीच स्थिती मागील काही वर्षांत सुरु असल्याने सध्या शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सध्या शेतीची कामे धिम्या गतीने सुरु आहे.वसई-विरार उपद्रेशाच्या पूर्व भागातील ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भातशेतीची लागवड केली जाते. ही संपूर्ण शेती पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. शेती सिंचनासाठी पाण्याचे अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने पावसाळी पाण्यावर भातशेती आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या अवकृपेमुळे भातशेतीचे क्षेत्र सतत कमी होत आहे. काही गावात मात्र भातशेती टिकून आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर, दुसरीकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी धास्तावला आहे. पावसाळा तोंडावर आला की, शेतकरी बी-बियाणे व खतासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे फेऱ्या मारतात. परंतु येथील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेकवेळा तो कंटाळून बाजारात अधिक पैसे मोजून बी-बियाणे व खते खरेदी करतात. यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी आलेले कृषीसाहित्य मात्र थेट काळ््या बाजारात जातात. खताचा साठा किती येतो व किती शेतकऱ्यांना त्याचे वाटप होते. याचा शोध घेतल्यास गैरप्रकार उघडकीस येईल. परंतु या साखळीत अधिकारीच गुंतले असल्याने चौकशी होणार तशी कशी. कृषीक्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणार असे सांगणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या खताचा साठा कुठे जातो,याचा सर्वप्रथम शोध घ्यावा त्यानंतर कृषीक्षेत्र वाढीच्या घोषणा कराव्यात. अशीच स्थिती राहिल्यास उपप्रदेशात जी काही भातशेती शिल्लक आहे ती देखील लयाला जाण्याची भीती आहे.