शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

कामगारांनीच आता एसटी वाचविण्याच्या लढ्याला बळ द्यावे - विवेक पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:24 PM

तोट्यात जाण्यास सरकार जबाबदार : वसई आगारात एस टी चा ७१ वा वर्धापन दिन संपन्न

वसई : जोपर्यंत महाराष्ट्रात गोरगरीब जनता आहे, तोपर्यंत एसटीची बससेवा चालू राहिल कारण की, ती राज्याची जीवनवाहिनी आहे. एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी चालते, नफा कमावणे हा उद्देश्य नव्हता. मात्र एसटी महामंडळ तोट्यात जाण्याला सरकारची काही धोरणेच जबाबदार आहेत. अशी टिका विवेक पंडीत यांनी केली.

एसटी तर्फे ज्या वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात त्याचा परतावा शासनाकडून मिळत नसल्याने व कंत्राटदार धार्जिण्या धोरणामुळे एस टी तोट्यात गेली असल्याचे उद्गार राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष माजी आम. विवेक पंडित ह्यांनी शनिवारी वसई येथे एस टी कामगार संघटनेतर्फे आयोजित एसटी च्या ७१ व्या वर्धापनिदन सोहळ्यात बोलताना काढले.

यावेळी पंडित यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्याबद्दल कविवर्य सायमन मार्टिन व भरत पेंढारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पंडित यांनी विवेचन करतांना सांगितले की, सामान्य माणसाला जगायचे असेल तर खाजगीकरणाविरोधात पेटून उठलेच पाहिजे. एसटी राज्याच्या कानाकोपऱ्यात जात असते. म्हणून कामगारांनीच जनतेचं प्रबोधन करु न एस टी वाचवण्याच्या लढ्याला बळ द्यावे.तसेच सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर बोलतांना कामगार नेते भरत पेंढारी म्हणाले की, कामगारांना उध्वस्त करुन कुठलेही राज्य प्रगति करू शकत नाही, कष्टकरीच देश घडवत असतात. मात्र दुर्दैवाने सध्याची सरकारी धोरणं कामगार विरोधीच असल्यामुळे सर्वत्र अस्वस्थता आहे.

यावेळी जन आंदोलनाच्या नेत्या कु,डॉमनिका डाबरे, कवी मार्टिन ,भाजपचे दत्ता नर एसटी महामंडळाचे दिलीप मोरे आदींची समयोचित भाषणे झाली. यावेळी सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला.