शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

Palghar: भ्रष्टाचाराच्या पैशांवरून अधिकाऱ्यांमध्ये जुंपली, जव्हार कृषी विभागात घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 08:03 IST

Corruption: जव्हार कृषी विभागात त्यात मोठा भ्रष्टाचार उघड झाला असून, भ्रष्टाचाराचे पैसे कृषी अधिकाऱ्याला मिळाले नसल्याने तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

- हुसेन मेमनजव्हार - राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागात वाटप करण्यात आला असून, पालघर जिल्ह्यात हा निधी फक्त कागदावरच असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, जव्हार कृषी विभागात त्यात मोठा भ्रष्टाचार उघड झाला असून, भ्रष्टाचाराचे पैसे कृषी अधिकाऱ्याला मिळाले नसल्याने तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादाचे व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागले आहेत.

जव्हार तालुक्यात कृषी विभागात एक तालुका कृषी अधिकारी, दुसरे कृषी अधिकारी तसेच मंडळ अधिकारी-१ व मंडळ अधिकारी-२ अशी पदे आहेत. त्यामध्ये कृषी अधिकाऱ्याला बायपास करून देयके अदा करण्यात आल्याने व त्याला वाटा मिळाला नसल्याने दोघा अधिकाऱ्यांमधील वाद उफाळला आहे. भ्रष्टाचाराचे पैसे दोघांमध्ये बरोबर वाटप झाले नसल्याने दोघांत कडाक्याचे भांडण होत असून, दोन्ही अधिकारी एकमेकांवर ताशेरे ओढत असल्याचा व्हिडीओ हाती आला आहे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान महाराष्ट्रात राबविले जात असून कृषी आयुक्तांनी कृषी विभागास २०२२-२३ साठी ३७६२.५८० लाख निधी मंजूर केला आहे. २०२३-२४ साठी १६४७५.७७५ लाख निधी मंजूर करण्यात आलेला असून ३१ जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 

वाटा मिळाला नसल्यामुळे बाचाबाची - जव्हारचे तालुका कृषी अधिकारी दीपक सोमवंशी यांनी स्वत: व मंडळ कृषी अधिकारी-१ जयराम आढळ व मंडळ कृषी अधिकारी-२ संजीव गोसावी यांनी ‘पेड बाय मी’ देयके सादर केल्यामुळे कार्यालयातील कृषी अधिकारी वसंत नागरे यांनी ‘पेड बाय मी’मध्ये त्यांचे नाव नसल्याने त्यांना वाटा मिळाला नाही. - त्यामुळे नागरे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात तालुका कृषी अधिकाऱ्यांबरोबर बाचाबाची करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मागील दोन महिन्यांपासून रोजच सोमवंशी व  नागरे यांचा तमाशा सुरू असल्याने कार्यालयात चर्चेला उधाण आले असून झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :palgharपालघरCorruptionभ्रष्टाचार