शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

रोजगार उपलब्ध करून देण्यात पालघर राज्यात प्रथमस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:54 PM

मनरेगाअंतर्गत २५४८ कामे : ६०,४६१ मजुरांची उपस्थिती

पालघर : जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत एकूण २५४८ कामे सुरू असून त्यावर ६०,४६१ मजुरांची उपस्थिती आहे. या योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षात १ एप्रिलपासून ३९,५४१ कुटुंबांतील ८०,०५० मजुरांना कामे दिली आहेत. यापैकी ३६,७३६ आदिवासी कुटुंबे असून सर्वाधिक आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. पालघर जिल्हा रोजगार उपलब्ध करून देण्यात राज्यात प्रथम स्थानी आहे.

जिल्ह्यात शेल्फवर १२,२८८ कामे उपलब्ध असून यापैकी ९,००९ कामे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध आहेत. ३,२७९ कामे यंत्रणा स्तरावर उपलब्ध आहेत. २०२०-२१ मध्ये १ एप्रिलपासून आतापर्यंत ८,२९,७२६ इतकी मनुष्यदिन निर्मिती झालेली असून यात जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात मार्च २०१९ अखेर एकूण २४.६१ लक्ष इतकी मनुष्य दिवस निर्मिती झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी दिली. मनरेगा योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षात १ एप्रिलपासून आतापर्यंत १९००.०८ लक्ष इतका निधी मजुरांच्या मजुरीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे . २०१९-२० या मागील वर्षात पालघर जिल्ह्यात एकूण ६६३६.७६ लाख इतका खर्च झालेला असून त्यापैकी ५११७.६३ लाख इतकी रक्कम अकुशल मजुरीकरिता खर्च झालेली आहे.१ एप्रिलपासून केंद्र शासनाने मजुरीच्या दरामध्ये वाढ केली असून राज्यासाठी हा दर २३८ रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे. मागील वर्षी हा दर २०६ इतका होता. राज्याकरिता मजुरीच्या दरात ३२ रुपये वाढ झालेली आहे. पालघर जिल्ह्यात मजुरांना मजुरी आठ दिवसांच्या आत प्रदान करण्याचे प्रमाण १०० टक्के आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार