शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मीरा भाईंदर - वसई विरारमध्ये तिरंगा घेऊन ७५ किमी धावले पोलीस

By धीरज परब | Published: July 31, 2022 9:19 PM

स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष असल्याने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने मीरा भाईंदर आणि वसई विरार परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्र

मीरारोड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात पोलीस राष्ट्रध्वज घेऊन ७५ किलोमीटर धावले. पोलिसांची तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली .  

स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष असल्याने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने मीरा भाईंदर आणि वसई विरार परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक घरात तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत आज रविवारी  ७५ पोलीस जवान हे प्रत्येकी १ किलोमीटर राष्ट्रध्वज घेऊन धावले आणि ७५ किलोमीटरचे  तिरंगा रॅलीचे अंतर पूर्ण केले .  

 'तिरंगा रॅली रन' उत्तन पोलीस ठाणे व वसई पोलीस ठाणे या दोन ठिकाणावरून सकाळी ६ वाजता एकाच वेळी सुरू करण्यात आली होती . ह्या दोन्ही रॅलीचा समारोप वसई पूर्वेच्या नवजीवन फाटा येथील अप्पा मैदानात करण्यात आला.  उत्तनच्या काका बाप्टिस्टा चौक पोलीस चौकी येथून सुरु झालेली तिरंगा रॅली राई , परशुराम चौक , स्वातंत्र्यवीर सावरकर चौक गोल्डन नेस्ट, शांती नगर , सृष्टी चौक सिग्नल , डेल्टा गार्डन चौक, काशीमीरा नाका- घोडबंदर खिंड, वरसावे पूल उलांडून वसई महामार्ग, सातिवली खिंड, तुंगारेश्वर पूल मार्गाने अप्पा मैदानात पोहचली . तर वसई पार नाका येथून सुरु झालेली रॅली अंबाडी नाका, वसई वाहतूक शाखा कार्यालय, बोळींज मस्जिद, जुने विवा कॉलेज, ओस्तवाल शाळा, तुळींज पोलीस ठाणे, रेंज नाका ह्या मार्गाने मैदानात पोहोचली. 

या तिरंगा दौड मध्ये पोलीस आयुक्त सदानंद दाते, पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, पंकज शिरसाट सह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या शिवाय प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील शांतता समिती व मोहल्ला समिती सदस्य, पोलीस मित्र व नागरिकांनी तिरंगा रॅली दरम्यान धावणा-या पोलिसांचे स्वागत करत त्यांच्या उत्साह वाढविला. पोलिसांकडून या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतानाच नागरिकांना अखंडता, एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश दिला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस