शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

पालघरमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश, लोण आता शहरापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 8:45 AM

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालविवाहाचे लोण पालघर शहरात पोहोचले आहे.

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालविवाहाचे लोण पालघर शहरात पोहोचले आहे. लग्न मंडपात दोन अल्पवयीन मुलांची लग्नगाठ बांधली जात असताना पालघर पोलिसांनी हे लग्न रोखत वधूला विरारच्या गुड शेफर्ड संस्थेकडे सुपूर्द केले आहे.

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल असून, जिल्ह्याच्या पूर्व भागाकडील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी आदी आदिवासीबहुल दुर्गम भागात अल्पवयीन मुला-मुलींची लग्न लावून देण्याची प्रथा आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हे बालविवाह रोखण्यासाठी अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न फोल ठरत असताना पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून ‘जनसंवाद अभियान’ या सामाजिक स्वास्थ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अभियानाला मोठे यश येत आहे. अनेक लोक या अभियानाला जोडले गेले आहेत. त्यातून अतिदुर्गम भागात आजही अनेक कुटुंबे स्वतः पुढे येत बालविवाहाला विरोध दर्शवत आहेत.

पालघर शहरातील न्यायालयाच्या शेजारी असलेल्या शांती नगर येथे अल्पवयीनांचा विवाह लावला जात असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनकडून पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अप्पासाहेब लेंगरे यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक मंजुळा शिरसाठ आणि उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे यांना घटनास्थळी पाठवले. तेथे पोलिसांना साध्या वेशात पाठवून संध्याकाळी ६:३० च्या दरम्यान लग्नगाठ बांधली जात असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करीत लग्न थांबविले. 

नवरी मुलीचे कुटुंब यवतमाळचेनवरी मुलीचे कुटुंब यवतमाळचे आहे, तर  नवरदेवाचे कुटुंब पालघरचे आहे. दोन्ही कुटुंबांच्या मुलांचे कागदोपत्री पुरावे तपासल्यानंतर नवरदेवाचे वय १९, तर नवरी मुलीचे वय १७ असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर गावाकडे अशीच लग्ने लावली जात असतात, असे सांगत दोन्ही अल्पवयीन मुलांना सोडण्याची वऱ्हाडी मंडळी विनंती करत होते. मात्र, पोलिसांनी नवरी मुलीला महिला बालकल्याण समितीकडे पाठविले. समितीच्या आदेशाने या मुलीला विरार येथील गुड शेफर्ड संस्थेत पाठविण्यात आले. पुढील कारवाई पालघर पोलिस करत आहेत.

टॅग्स :palgharपालघर