शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

पालघर शहरातील बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 7:40 PM

दोन्ही कुटुंबे यवतमाळ येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर :पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालविवाहाचे  लोन पालघर शहरात पोहचले असताना लग्न मंडपात दोन अल्पवयीन मुलांची लग्नगाठ बांधली जात असताना पालघर पोलिसांनी हे लग्न रोखून धरीत वधूला विरारच्या गुड शेफर्ड संस्थेकडे सुपूर्द केले आले. दरम्यान, दोन्ही कुटुंबे यवतमाळ येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल असून जिल्ह्याच्या पूर्व भागाकडील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी आदी आदिवासीबहुल दुर्गम भागात अल्पवयीन मुला- मुलींची लग्न लावून देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात आजही सुरू आहे. त्यातून कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हे बालविवाह रोखण्यासाठी अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न फोल ठरत असताना पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियान या सामाजिक स्वास्थ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अभियानाला मोठे यश येत आहे. अनेक लोक या अभियानाला जोडले गेले आहेत. त्यातून अतिदुर्गम भागात आजही अनेक कुटुंबे स्वतः पुढे येत बालविवाहाला विरोध दर्शवत आहेत.

पालघर शहरातील न्यायालयाच्या शेजारी असलेल्या शांतीनगर येथे दोन अल्पवयीन मुलांचा विवाह लावला जात असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनकडून पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अप्पासाहेब लेंगरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सपोनि मंजुळा शिरसाठ आणि उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे यांना घटनास्थळी पाठवले. त्या ठिकाणी दोन पोलिसांना साध्या वेशात पाठवून खातरजमा केल्यानंतर संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान हे लग्न लावण्याच्या दरम्यान लग्न गाठी बांधल्या जात असतानाच अचानक पोलिसांनी हस्तक्षेप करीत हे लग्न थांबवले.

दोन्ही कुटुंबे यवतमाळमधील

 यवतमाळ येथील कुटुंबे असलेल्या या दोन्ही मुलांचे कागदोपत्री पुरावे तपासल्यानंतर नवरदेव मुलाचे वय १९ तर नवरी मुलीचे वय १८ असल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर गावाकडे अशीच लग्ने लावली जात असतात, असे सांगत दोन्ही अल्पवयीन मुलांना सोडण्याची वऱ्हाडी मंडळींची विनंती पोलिसांनी नाकारली आणि नवरी मुलीला महिला बालकल्याण समिती पालघर यांच्याकडे पाठविण्यात आले. त्या समितीच्या आदेशाने या मुलीला विरार येथील गुड शेफर्ड संस्था येथे पाठविण्यात आले. पुढील कारवाई पालघर पोलिस ठाण्याच्या सपोनी शिरसाठ या करीत आहेत.

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारी