शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

पेल्हार येथील स्मशानभूमीची दुरवस्था; मरणानंतरही यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 12:54 AM

वसई-विरार महापालिकेच्या उदासीनतेमुळे तीव्र नाराजी

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मरणानंतरही मृतदेहांना यातना भोगाव्या लागत असून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे पेल्हार गावातील वनोठापाडा येथील स्मशानभूमी शेवटच्या घटका मोजत आहे. स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या, बसण्यासाठी जागा नाही, पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब, पाण्यासाठी शेजारी असलेल्या घाणेरड्या पाण्याचा वापर, दिवाबत्तीची सोयही कोमात, स्मशानभूमीत कोणीही सरकारी कर्मचारी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना लाकडे स्वतः रचावी लागतात, अशा अनेक प्रश्नांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गडग्याचा पाडा, इंदिरा वसाहत, वाकणपाडा, पेल्हार, वनोठा पाडा, वसई फाटा, अवधूत आश्रम, डोंगरीपाडा या परिसरातील नागरिक येतात. वाॅर्ड नंबर-१ आणि वाॅर्ड नंबर-४३ या दोन्ही वाॅर्डच्या सीमेवर ही स्मशानभूमी असल्याने आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या परिसरात अंदाजे १० ते ११ हजार मतदार असून त्यांना सुविधा मिळत नसल्याने या स्मशानभूमीची डागडुजी केली नाही तर आगामी वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. मेल्यानंतरही लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास असून कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत लक्ष दिले नाही. कोणीही मनपाचा कर्मचारी या ठिकाणी हजर नसतो.    - राजू दास, ग्रामस्थया स्मशानभूमीबाबत माहिती घेतो आणि तिची दुरवस्था झाली असेल तर तातडीने डागडुजी करण्यात येईल.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिकाधोकादायक छताखाली होतात अंत्यसंस्कारमहानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आणि धोकादायक झाली आहे की अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना भीती वाटते. त्याचबरोबर संरक्षक भिंतीना मोठमोठ्या भेगा पडल्या असून आसन व्यवस्था असलेली भिंत कोसळलेली आहे. बाथरूमचे तिन्ही दरवाजे गायब असून त्यांच्या भिंतीना तडे गेलेले आहेत. विजेचा पोलही वाकलेल्या अवस्थेत आहे.