शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

पावसाने फिरवले ५०० कोटी रुपयांवर पाणी

By admin | Published: June 20, 2015 12:58 PM

शुक्रवारच्या पावसानं नुसतं मुंबईचं जीवनमान ठप्प केलं नाही तर दुकानदारांचं सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान केलं असा अंदाज या क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - शुक्रवारच्या पावसानं नुसतं मुंबईचं जीवनमान ठप्प केलं नाही तर दुकानदारांचं सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान केलं असा अंदाज या क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये सुमारे ३.५ लाख दुकाने असून त्यातील जवळपास ८० टक्के दुकाने शुक्रवारी बंद ठेवावी लागली होती.
फेरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांच्या सांगण्यानुसार रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे बहुतेक दुकानांमधील कर्मचारी कामावर आले नाहीत, तसेच रस्ते ओस पडले होते आणि ग्राहकही फिरकत नव्हते. मुंबईमध्ये सुमारे ३.५ लाख दुकाने असून दिवसाला प्रत्येक दुकानाचे सरासरी उत्पन्न १० ते १५ हजार रुपयांचे आहे. त्यामुळे अंदाजे मुंबईकर दुकानदारांचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही दुकानांचे उत्पन्न दिवसाला लाखात आहे तर काहींचे हजारात आहे, परंतु सरासरी १० ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न आहे असे ते म्हणाले.
दुकानांमध्ये पाणी शिरुन अनेक ठिकाणी मालाचे नुकसानही झाले आहे, परंतु त्याची आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही त्यामुळे ते नुकसान वेगळेच आहे. दुकानांपाठोपाठ दुसरा मोठा धक्का हॉटेलांना बसला आहे. उपनगरांमधले चाकरमानी शहरात आलेच नाहीत त्यामुळे बहुतेक हॉटेल व रेस्टॉरंट ओस पडलेली होती असे आहारच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी सांगितले. मुंबईतल्या प्रत्येक हॉटेलला हा फटका बसल्याचे शेट्टी म्हणाले.