शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

ढगाळ वातावरणाचा फटका, रब्बीही संकटात, शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:39 PM

जिल्ह्यात रिमझिम : रब्बीही संकटात, शेतकरी चिंताग्रस्त, सुक्या मच्छीचे उत्पादन घटणार

डहाणू/बोर्डी : दिवाळीपर्यंत कोसळलेल्या अवकाळी पावसाच्या धक्क्यातून सावरून उमेदीने रब्बी हंगामात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उमेदीवर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आणि पावसाने पाणी फेरले आहे. बुधवार, २५ डिसेंबरच्या पहाटे साडेचार ते पाच दरम्यान डहाणू तालुक्यात सुमारे वीस मिनिटे रिमझिम पाऊस झाला तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी हंगामातील मिरची आणि भाजीपाला पीक तसेच सुकी मच्छीच्या व्यवसायावरही परिमाण होणार आहे.

जमिनीत ओलावा असल्याने यंदा तशीही रब्बी हंगामाला उशीरा सुरुवात झाली. तालुक्यात मिरची हे प्रमुख नगदी पीक असून त्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे या पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने लागवडीच्या पहिल्या टप्प्यात शेतकºयांना कीटकनाशक फवारणीवर खर्च करावा लागत आहे. वांगी, भाजीपाला आणि वेलवर्गीय पिकावरही याचा परिणाम होईल. जिल्ह्याच्या काही भागात आंबा मोहरण्यास प्रारंभ झाला आहे. काही ठिकाणी वाटाण्याच्या आकारातील फळे धरली आहेत. याचबरोबर सफेद जांबूला फळगळतीचा धोका संभवू शकतो. तर लिची फळाच्या मोहराची प्रक्रिया याच कालावधीत होत असल्याने भुरी आणि डावणी आदींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. याकरिता प्रती लिटर १ ग्रॅम याप्रमाणे कार्बनडेझिम हे बुरशीनाशक फवारावे, अशी माहिती कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी दिली. हा तालुका सुकी मच्छीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. विशेषत: धाकटी डहाणू येथे बोंबील, जवळा आदी मच्छी सुकविण्याचे काम केले जाते. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने वाळत टाकलेल्या माशांचे नुकसान झाले होते. हे वातावरण आणखी काही दिवस कायम राहिले आणि अवकळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होऊन व्यावसायिकांवर मोठा परिमाण होऊ शकतो. तर पावळी आणि गवत व्यापारावरही पुन्हा एकदा संकट ओढवून दुग्ध व्यवसायावर टांगती तलवार आहे. पहाटे झालेल्या पावसानंतर दिवसभर ढगाळ वातावरण आणि गारठा असल्याने हुडहुडी भरणारी थंडी जाणवली. घशाचे विकार, दमा, सर्दी आणि खोकला हा त्रास मुले, ज्येष्ठांना सहन करावा लागला. वर्ष सरेपर्यंत टप्प्या-टप्प्याने पाऊस पडतोच आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात झालेला पाऊस आता जि.प. आणि पं.स. निवडणुकीच्या दरम्यानही सोबत असल्याचा प्रत्यय येतो आहे.दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणविक्रमगड : दोन ते तीन दिवसापासून वातावरणात बदल झाला असून हवामान ढगाळ आहे. यामुळे भाजीपाला, आंबा या पिकावर परिणाम होऊ शकतो असे शेतकºयांचे मत आहे. या वातावरणामुळे काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने गवत व विटभट्टी व्यापाºयांची भाती वाढली आहे. अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बीतून तरी काही हाती लागेल अशी त्यांची अपेक्षा आहे.कुंद वातावरणामुळे रोगाचे सावट, भाजीपाला, कडधान्य व फळपिकांचे नुकसानच्वाडा : गेला आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाला, कडधान्य तसेच फळ पिकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.च्तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतात विहीर किंवा कूपनलिका मारून शेतकरी भाजीपाला, कडधान्याचे तसेच फळ पिकांचे उत्पादन घेत असतात. मात्र, गेला आठवडाभर ढगाळ वातावरण असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. भाजीपाला, कडधान्य यांवर रोग पडला असून औषध फवारणी करूनही रोगांचे उच्चाटन होत नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली.च्आंबा व काजू या फळांचा मोरही ढगाळ वातावरणामुळे हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. वाडा तालुक्यातील भाजीपाला कडधान्य व फळ पिकांचे झाले असून त्यांचे पंचनामे करून त्याना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार