शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

रस्ता रुंदीकरणाने वाढला जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:07 PM

नागरिकांना फायदा शून्य : भार्इंदर पूर्वेला अतिक्रमणाचा विळखा, प्रदूषणात झाली वाढ

भाईंदर : महापालिकेने भार्इंदर पूर्वेला रेल्वेस्थानकासमोर मोठा गाजावाजा करत केलेल्या रस्ता रुंदीकरणाचा नागरिकांना फायदा तर झाला नाहीच, उलट जाच वाढला आहे. बेकायदा लागणाऱ्या रिक्षा व हातगाड्या तसेच पार्किंगमुळे वाहतूककोंडी, ध्वनी, वायुप्रदूषण वाढले आहे.

भार्इंदर पूर्वेत रेल्वेस्थानकासमोरील समांतर रस्ता अरुंद असून जुन्या इमारतींमुळे संपूर्ण रुंदीकरण रखडले आहे. तर, बंदरवाडीनाका व प्रशांत हॉटेलजवळील नाका तेथील बांधकामे तोडून पालिकेने रुंद केली होती. या रुंदीकरणाला विरोध झाला, तसेच राजकीय श्रेय लाटण्याचा खटाटोपही झाला. परंतु, रस्त्याच्या दोन्ही टोकाला झालेल्या रुंदीकरणामुळे समस्या सुटली नाही. उलट, जाच वाढला आहे.या ठिकाणी फेरीवाल्यांच्या हातगाड्या तसेच टपºया वाढल्या असून भररस्ता व पदपथावर अतिक्रमण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असताना सर्रास न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत. फेरीवाल्यांच्या हातगाड्या व टपऱ्यांपेक्षा जास्त मुजोरी रिक्षाचालकांची सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त रिक्षा या भागात उभ्या केल्या जातात. त्यातच रिक्षातळ सोडून भररस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जातात. भाडे घेण्यासाठी बेकायदा उभ्या राहणाºया रिक्षाचालकांवर कारवाई अजिबात केली जात नाही. बसस्थानकावरही रिक्षाचालकांचा विळखा असल्याने प्रवाशांना रस्त्यात थांबावे लागते. दुचाकी आणि खाजगी वाहनांचे बेकायदा पार्किंग या त्रासात आणखी भर टाकते.फेरीवाल्यांच्या हातगाड्या, टपºया, खाजगी बेकायदा पार्किंग आणि रिक्षाचालकांच्या मस्तवालपणामुळे भार्इंदर पूर्वेला रेल्वेस्थानक समांतर मार्ग व नाके प्रचंड वाहतूककोंडीने ग्रासले आहेत. वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण प्रचंड वाढले आहे. धूर व धुळीमुळे वायुप्रदूषण वाढले आहे.नागरिकांना तर पदपथ व रस्त्यावरून चालणेही जिकिरीचे झाले आहे. रस्ता ओलांडतानाही कोंडीमधून मार्ग काढणे जाचक ठरत आहे. यातून किरकोळ अपघात व गाडी लागल्याने भांडणेही नेहमीचीच झाली आहेत. प्रशांत हॉटेलनाका परिसर जॅम झाला की, रेल्वेस्थानक समांतर मार्गासह बाळाराम पाटील मार्ग व महात्मा फुले मार्गावर रांगा लागतात. सकाळपासून रात्रीपर्यंत कोंडी, रिक्षा-हातगाड्यांच्या अतिक्रमणाची स्थिती कायम असते.यंत्रणा देतीलका लक्ष?च्या जटिल समस्येकडे स्थानिक नगरसेवकांसह महापालिका, वाहतूक शाखा व नवघर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.च्सोयीच्या गोष्टींसाठी धावणाºया या यंत्रणा भार्इंदर पूर्वेच्या रेल्वेस्थानकासमोरील या गंभीर बनलेल्या समस्येवर सातत्याने ठोस कारवाई व उपाययोजना करण्यास मात्र उदासीन असल्याने नागरिकांना या जाचातून सुटका मिळणे अवघड झाले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार