शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

पावसाच्या पुनरागमनाने भाताला संजीवनी

By admin | Published: July 27, 2015 10:57 PM

गेल्या २० जुलै पासून सुरु झालेल्या पावसाने भातपिकांना संजीवनी मिळण्याची शक्यता वाढली आहे. या पावसाच्या पुनरागमनाने बोर्डी, घोलवड, अस्वाली, कोसबाड, चिखले

घोलवड : गेल्या २० जुलै पासून सुरु झालेल्या पावसाने भातपिकांना संजीवनी मिळण्याची शक्यता वाढली आहे. या पावसाच्या पुनरागमनाने बोर्डी, घोलवड, अस्वाली, कोसबाड, चिखले, व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रखडलेल्या भात लावणीच्या कामाला सुरु वात झाली आहे. जून नंतर जुलै महिन्यात पाऊस होईल अशी अशा शेतकऱ्यांना होती. परंतु पावसाने तब्बल वीस दिवस ओढ दिल्याने भात शेतीवर त्याचा दुष्परिणाम होऊ लागला होता. या भागातील शेतकरी आपली शेती कशीबशी टिकवण्यासाठी प्रयत्न करीत होते. अनेकांनी उसने पाणी घेऊन तर काहींनी डीझेलपंप व बोअरींगच्या पाण्याचा आधार घेत भातशेती राखण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश ठिकाणी पाणीच नसल्याने या वर्षीची भातशेती वाया जाणार अशी शक्यता होती.एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे कडक उन्हामुळे पिक करपू लागली होती. तर काही ठिकाणची भातरोपे पाण्याअभावी करपलीही. मात्र, पावसाची संततधार सुरु झाल्यास पिकांना दिलासा मिळणार आहे. मशागत करून भातपिकाच्या लावणीसाठी पावसाची वाट पाहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पावसाच्या पुनरागमनाने काही प्रमाणात का होईना शेतीला आधार मिळाला. त्यामुळे शेतकरी सावरला असला तरी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी व त्याच्या कुटुंबाची मेहनत मात्र पणाला लागली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकंदरीत पावसाबद्दल बळीराजा समाधानी आहे.