शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

भंडारी पतपेढीमध्ये घोटाळा; सहा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, खातेदारांच्या रकमेचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 5:54 AM

वसई तालुक्यातील भंडारी समाजाच्या प्रख्यात युवक सहकारी पतपेढीत तब्बल साडेआठ कोटी रु पयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस झाल्यामूळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संचालकांनी पतपेढीतील सहा कर्मचार्Þयांविरोधात दिलेल्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र हे सर्व आरोपी आता फरार आहेत.

पारोळ : वसई तालुक्यातील भंडारी समाजाच्या प्रख्यात युवक सहकारी पतपेढीत तब्बल साडेआठ कोटी रु पयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस झाल्यामूळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संचालकांनी पतपेढीतील सहा कर्मचार्Þयांविरोधात दिलेल्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र हे सर्व आरोपी आता फरार आहेत.वसईतील पारनाका येथे पतपेढीचे मुख्यालय असून भंडारी समाजातर्फे युवक सहकारी पतपेढी चालविण्यात येते. वसईच्या नालासोपारा येथे एक शाखा आहे. मात्र या पतपेढीत खातेदाराच्या आणि सभासदांच्या रकमेचा अपहार होत असल्याची बाब समोर आली आहे. संचालाकांनी पतपेढीतील सहा कर्मचाºयांना यापूर्वीच बडतर्फ करून त्यांच्याविरोधात निबंधक आणि पोलिसांकडे तक्र ार दाखल केली होती. या तक्र ारीची पडताळणी केल्यानंतर पतपेढीत तब्बल ८ कोटी ५६ लाख रु पयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पतपेढीच्या सहा कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात निवृत्त व्यवस्थापक मगनचंद राठोड, वसई शाखा व्यवस्थापक अविनाश चोरघे, सोपारा येथील शाखा व्यवस्थापक रितेश म्हात्रे, रोखपाल सुरज ठाकूर, लिपिक समीर पाटील, शिपाई संजय चौधरी आदींचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१,४७७ (अ) ४२०, ३४ सह एमपीआयडी अ‍ॅक्ट १९९९ चे कलम १४६ (प), १४६ (प), महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौधरी यांनी याप्रकरणी तक्र ार दिली होती. युवक सहकारी पतपेढी ही भंडारी समाजाची पतपेढी असून समाजातील लोकांनी यात आपले पैसे गुंतवले होते. संस्थेचे दोन हजार भागधारक आहेत. संस्थेचे थकीत कर्ज आहे. त्यातून कोट्यावधी रु पयांची येणी बाकी आहे. त्यातून खातेदारांची रक्कम दिली जाईल असे आश्वासन संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान उपाध्यक्ष पंकज चोरघे यांनी सांगितले. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल करत असून सर्व आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे वसईचे उपअधीक्षक ताटेवाड यांनी सांगितले.असा केला कर्मचाºयांनी घोटाळागेल्या काही वर्षापासून खातेदारांना त्यांनी भरेलल्या मुदत ठेवींचा परतावा मिळत नव्हता. त्यामुळे सभासदांनी पैशांच्या रकमेसाठी पतपेढीत तगादा लावला होता. संस्थेचे भागधारक एक भागधारक तसेच शिवसेना उपतालुकाप्रमूख अतुल पाटील यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.अतुल पाटील यांनी संचालक मंडळ व कर्मचा-यांविरोधात ५ एप्रिल रोजी आर्थिक गुन्हे शाखा पालघर येथे तक्र ार दाखल केल्यानंतर आपली कातडी वाचिवण्यासाठी विद्यमान संचालक मंडळांनी कर्मचाºयांना बळीचा बकरा बनवला असल्याचा आरोप केला आहे.परस्पर रकमा काढून व मुदतठेवी आणि बचतठेवीत फेरफारवसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कर्मचाºयांनी बचत ठेव, आवर्त ठेव, मुदत ठेव, दैनिक बचत ठेव, दाम दुप्पट योजना, शुभंकरोती योजना तसेच निवृत्ती ठेव योजना, पतसंस्थेच तारण ठेवलेल्या सोने आदी बनावट दस्तावेज तयार करून हडप केले होते.खातेदारांच्या खात्यातून परस्पर रकमा काढून व मुदत ठेवी आणि बचत ठेवीत फेरफार करून तारण कर्जामधील सोन परस्पर विल्वेवाट लावून ८ कोटी ५६ लाख १९ हजार एवढ्या रकमेचा अपहार केला आहे. अपहार करणारे सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापक यांनी संगनमत केले होते.ज्या खातेदाराने १० लाखाची मुदत ठेव जमा केली असेल त्याला १० लाखाची पावती दिली जायची मात्र प्रत्यक्षात ५ लाख रु पयेच जमा केले जायचे. तसेच अनेकदात खातेदारांच्या बोगस सह्या वापरून पैसे काढले जायये. वर्षातून दोनदा सरकारी आणि खाजगी लेखापरिणक्ष व्हायचे तरी देखील हा घोटाळा लक्षात आला नाही हे विशेष.

टॅग्स :Goldसोनं