शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

साहेब मेहरबानी करा, अन सभा टाळा उमेदवारांचे नेत्यांना साकडे

By admin | Published: June 08, 2015 4:29 AM

वसई-विरार महापालिकेच्या निवडणूकीत मात्र मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र आपल्या नेत्यांना साहेब मेहबानी करा, पण जाहीरसभा ठेऊ नका’ असे साकडे घालत आहेत.

वसई : निवडणूक म्हटली की सगळ्याच कार्यकर्त्यांची मागणी असते ती स्टार कॅम्पेनरच्या जाहीरसभा आयोजित करण्याची परंतु वसई-विरार महापालिकेच्या निवडणूकीत मात्र मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र आपल्या नेत्यांना साहेब मेहबानी करा, पण जाहीरसभा ठेऊ नका’ असे साकडे घालत आहेत.आधीच प्रचारासाठी वेळ अत्यंत कमी मिळालेला, वॉर्डांची फेररचना आणि त्यात घोषीत झालेले आरक्षण यामुळे उमेदवार शोधता-शोधता आलेले नाकीनऊ त्यामुळे सभा घेण्यापेक्षा उमेदवारांच्या घरोघरी जाऊन थेट संपर्क प्रस्थापित करणे कार्यकर्त्यांना व उमेदवारांना अधिक महत्वाचे वाटते आहे. एक सभा घेण्यासाठी किमान अर्धा दिवस तरी जातो. शिवाय गर्दी जमवायची कुठून? हा प्रश्न आहे. त्यात एवढा कुटाणा करून जर सभा ठेवलीच तरी कोणत्या क्षणी वादळ आणि पाऊस येईल याची कोणतीही शाश्वती नाही. शिवाय सभेचा खर्च करायचा कुणी? असाही प्रश्न आहे. त्यामुळे सभेमध्ये ताकद आणि पैसा खर्ची घालण्यापेक्षा पदयात्रा, थेटभेटी यावर अधिक भर देण्यास उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे अधिक पसंती देत आहेत. यामुळे वेळेचा चांगला वापर करता येईल, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांनी जाहीरसभांवर भर दिलेला नाही. सेना, भाजप युतीच्या सभा जरी सुरु असल्यातरी त्याबाबतही कार्यकर्ते आणि उमेदवार काहीसे कुर-कुर करीत आहेत. आम्ही सभा यशस्वी करायच्या की, प्रचार सांभाळायचा असा त्यांचा प्रश्न आहे. एखाद्या घटनेमुळे सभेवर कसे पाणी फिरते याचे उदाहरण युतीला पहायला मिळाले आहे. सवरा यांची सभा वसईमध्ये आयोजीत केली होती. परंतु हायवेवर झालेल्या अपघातात एका बालिकेचा बळी गेला आणि सगळे वातावरणच शोकाकुल झाले. अशा स्थितीत सभा घ्यायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला. सध्या वातावरणही क्षणात वादळ, क्षणात पाऊस मध्येच वीज जाणे असे बेभरवशी झाले आहे. त्यालाही कार्यकर्ते पार वैतागून गेले आहेत. (विशेष प्रतिनिधी)