शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पालघरच्या बंद योजना मार्गी लावा; पाणीपुरवठामंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:29 IST

केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या मागणीच्या आधारित धोरणांतर्गत विविध योजना राबविल्या जातात. 

पालघर : मुंबई, मीरा-भाईंदरला पाणी पुरवणारा पालघर जिल्हा मात्र तहानलेला राहत असल्याने मुख्यमंत्री चिंतित असून जिल्ह्यातील ९० टक्के बंद अवस्थेतील योजना येत्या दोन महिन्यांत मार्गी न लागल्यास कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड दम पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीदरम्यान दिला. ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या मागणीच्या आधारित धोरणांतर्गत विविध योजना राबविल्या जातात. 

जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जव्हार तालुक्यात १४, डहाणू ३१, तलासरी ३, पालघर ७, मोखाडा ९, वसई १, वाडा ६ तर विक्रमगड २ अशा एकूण ७३ पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू असताना एकाही योजनेतून पुरेसा पाणीपुरवठा लोकांपर्यंत होत नसल्याची बाब उपस्थित लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.  जिल्ह्यात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र युती असून ठेकेदारच पाणीपुरवठा विभाग चालवितात काय, असा संतप्त सवाल आमदार सुनील भुसारा यांनी उपस्थित केला.

मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसई-विरारला पाणी पुरविणारा आमचा जिल्हा मात्र कित्येक वर्षांपासून तहानलेला राहिला असून जिल्ह्यातील एकही पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याचे सांगून धरण क्षेत्रातून विस्थापित झालेल्यांचे अजून पुनर्वसन झाले नसल्याची बाब खासदार राजेंद्र गावितांनी निदर्शनास आणून दिली.

विश्वास फाउंडेशनचे डॉ. विश्वास वळवी यांनी मंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नातून पाणीपुरवठामंत्र्यांना पालघरला आणण्यात यश मिळविले. यावेळी जि.प. अध्यक्षा भारती कामडी, माविम अध्यक्षा ज्योती ठाकरे, आ. श्रीनिवास वणगा, राजेश पाटील, सेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राजेश शहा, ज्योती मेहेर, तालुकाध्यक्ष विकास मोरे, सभापती सुशील चुरी, काशिनाथ चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ आदी उपस्थित होते. 

टॅग्स :palgharपालघर