शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वसई-विरारच्या ‘रिक्षा गँग’ला वेळीच रोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 00:24 IST

राहुल गांधी पंतप्रधान झाले : तर देश कार्टुन नेटवर्क बनेल - आदित्य ठाकरे

डहाणू : महायुती समोर संघटना नसून गुंडांची टोळी आहे, अशी टीका युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. ही टोळी तुमची जमीन लुटणारी, दादागीरी करणारी आहे. संवादातून चर्चा करत असतांना महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास जनता व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना महायुतीच्या सभेला ते गुरुवारी डहाणूत आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख राजेश शहा, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ, उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी, युवा पदाधिकारी हेमंत धर्ममेहेर, महीला विकास महामंडळ जिल्हा प्रमुख ज्योती ठाकरे, नगराध्यक्ष भरत राजपूत श्रमजीवी संघटनेचे रामभाऊ वारणा, श्रमजीवी जिल्हाध्यक्ष सुरेश रिंजड ज्योती मेहेर, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, श्रीनिवास वनगा, संजय पाटील, संजय कांबळे यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महाआघाडीमध्ये सर्वांना पंतप्रधान बनवायचे आहे. राहुलजी ओसामाला ओसमाजी म्हणतात. आणि सावरकरांना कायर डरपोक म्हणतात. देशाचा विचार करुन मतदान करा.राहुल गांधी पंतप्रधान केले तर देश कार्टुन नेटवर्क बनेल अशी टिकाही त्यांनी केली. महायुतीची सत्ता येण्यापूर्वी ५ वर्षे वेगळी होती. काँग्रेसचा हात खिशात होता. जनतेचे पैसे खात्यात गेले. काँग्रेसने तेलगी, सिंचन, टू- जी चे घोटाळे केले आहेत. त्यामुळे आमची पाच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीचे पाप धुण्यात गेली. मात्र पुढची पाच वर्ष महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी जाणार आहेत. रस्ते, उद्योग एअरपोर्ट तयार होत आहेत. उद्योगातून रोजगार मिळत आहे. चौपदरीकरण होत आहे. सिंचनाची कामे होताना दिसत आहेत. पापाचा पैसा हातात घेऊ नका, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेचे बटण दाबावे लागेल. ३७० कलम ठेवुन, देशद्रोहाचे कलम काढून, ओमर अब्दुल्लांना काश्मिरमध्ये स्वतंत्र पंतप्रधआन नेमण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे आदित्य म्हणाले.महाआघाडीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांनी बहुजन विकास आघाडी पक्ष नसून संघटना आहे. २००९ ते १४ साली विरोधकांना निवडुन दिले होते. या काळात बळीराम जाधव यांनी संसदेत एकही प्रश्न विचारला नाही. त्यांना स्वत:चे लेटर हेड विचारावे लागते. सरकारी, वन विभागाच्या जमीनी संपल्या आता सफाळा, पालघर बोईसर डहाणुकडे सरकले आहेत. माझ्याकडे पालघर जिल्हयाच्या विकासाचा रोड मॅप तयार आहे असेही गावीत म्हणाले राष्ट्रवादी, काँग्रेस विकली गेल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019