शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सूर्यफूल शेती ठरतेय शेतकऱ्यांना वरदान, पालघरमध्ये बळीराजाचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 9:51 AM

पालघरमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत सूर्यफूल लागवड करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जव्हार, विक्रमगड, पालघर व डहाणू तालुक्यातील शेतकरी हा प्रयोग साधत आहेत. याकरिता ‘बायफ’ म्हणजेच भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशनकडून मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, शेतकऱ्यांना तीन महिन्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांपर्यंत उत्पादन मिळाले आहे.

आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘बायफ’ विविध पद्धतीने काम करते व कार्यक्रम राबवते. याच कार्यक्रमांचा एक उपक्रम म्हणून २०० हून अधिक शेतकऱ्यांंना प्रत्येकी सात गुंठेेकरिता ५०० ग्रॅम बियाणे देऊन मार्गदर्शन केले. त्यात सूर्यफूल, मोहरी, करडई, तीळ यांसारख्या तेलबियांचे उत्पादन मुख्य वा मिश्र पिके घेण्यास सुरुवात केली आहे. भात कापणीनंतर शेतातील उरलेल्या ओलाव्यावर पिके घेण्यास मोठा वाव आहे. परिसंस्थेच्या, जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मोहरी, करडई आणि सूर्यफूल यांसारख्या तेलबिया, जमिनीत असलेल्या ओलाव्यावर पेरणी किंवा टोकन पद्धतीने भाजीपाला पिकांमध्ये आंतर पीक म्हणून घेतले जात आहे.

सूर्यफूल हे हिवाळी व उन्हाळी या दोन्ही हंगामात घेता येऊ शकते. कापणीपर्यंत थोड्या - अधिक प्रमाणात सिंचनाची आवश्यकता असते. आदिवासी शेतकऱ्यांनी रस घेऊन तेलबियांची काळजीपूर्वक लागवड केली. एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे कीड नियंत्रणात आणि शेतातील फायदेशीर कीटक वाढण्यास मदत होते. रासायनिक कीटकनाशकावर होणारा खर्चही कमी होऊ शकतो. पालघर, जव्हार, विक्रमगड आणि डहाणू तालुक्यातील शेतकरी या पद्धतीचा उपयोग करत आहेत. ‘महाराष्ट्र बायफ’चे मुख्य कार्यक्रम अधिकारी सुधीर वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली, विनोद बोरसे, किरण भागडे, पंकज परदेशी, संतोष आगळे, नितीन भोये या ‘बायफ’च्या जव्हारमधील टीममार्फत अंमलबजावणी झाली.

२०० शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग२०० शेतकऱ्यांना सात गुंठे जागेत ५०० ग्रॅम बियाणे देण्यात आले. तीन महिन्यात उत्पन्न येत प्रत्येकी ५० किलोग्रॅम तेलबियांचे उत्पन्न निघाले. त्या तेलबियांतून प्रत्येक शेतकऱ्याने तेल काढल्यानंतर २५ किलो सूर्यफुलाचे तेल उत्पादित झाले. प्रत्येकी २०० रुपये किलोच्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी पाच हजार रुपये मिळाल्याने ‘बायफ’कडून एक चांगला प्रयोग यशस्वी झाला.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारFarmerशेतकरी