शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

टॅँकरचे १२ प्रस्ताव मंजूर, १७ धूळखात

By admin | Published: March 10, 2017 3:35 AM

दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

- रविंद्र साळवे,  मोखाडादरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे मार्च एप्रिलमध्ये उधभवणाऱ्या भीषण पाणी टंचाईला कसे सामोरे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, त्या संदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टॅँकरच्या १२ प्रस्तावांना मंजूरी मिळाली असून १७ प्रस्ताव अजुनही धुळखात पडून आहेत.मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून तालुक्यातील धामणी कुंडाचापाडा तुंगारवाडी स्वामीनगर दापटी ब्राम्हणगाव हटीपाडा घोसाळी गोळीचा पाडा धामोडी पेंडक्याची ठवळ पाडा टेलीउंबरपाडा असे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे २९ प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने सादर केलेले मोखाडा तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांना २४ तासात मंजुरी देणे असा शासन नियम असताना एक महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर गोळीचापाडा, धामोडी, दापटी , धामणी, स्वामीनगर, कुंडाचापाडा, ब्राम्हणगाव, तेलीउबरपाडा, ठवळपाडा, चास, हटितीपाडा असे ३ गावे ९ पाड्यांचे प्रस्ताव व यांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८ टॅकर मंजूर करण्यात आले आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला धामोडी गोळीचा पाडा ठवळपाडा अशा तीन गावपाड्यांना २ टँकरने पाणी पुरवठा सुरु असून १ टँकर उभे करून ठेवले आहेत. उर्वरित १७ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर धूळखात पडले आहेत. यामुळे येथील गावपाड्यांना अद्याप तरी त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. दरवर्षीच येथील भूमीपुत्रान वर पाणी टंचाईचे संकट येत असल्याने घोटभर पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते. टँकरच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्च करणारे प्रशासन या ठिकाणी मुबलक पाणीसाठा असूनही निजोजन करण्याचा प्रयत्न करत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांचे सदोष धोरण अन् टंचाईचा कळस- झोपी गेलेले प्रशासन अजूनही पाणी टंचाई कडे गांभीर्य ने बघत नाही येथील रोजगाराचा प्रश्न किंवा कुपोषण पाणीटंचाई समस्या असो माध्यमांची भूमिका निर्णायक राहिली आहे. गेल्या काही महिन्यापासून मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधव पाणी टंचाईच्या समस्येने बेजार झाला आहे.याबाबत लोकमतने सडेतोड लिखाण करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. त्याच बरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा टँकरच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिल्याने तात्काळ ९ प्रस्ताव व ६ टँकर मंजूर केल्या आहेत परंतु असे असले तरी घोटभर पाण्यासाठी कोसोमैल भटकंती करावी लागत आहे.२४ तासात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे धोरण असताना जिल्हाधिकारी या धोरणाची अम्मल बजावणी करीत नाहीत. त्यामुळे एक महिन्याचा कालावधी नंतरही १७ प्रस्ताव पडून आहेत. १२ प्रस्तावना मंजुरी दिली असली तरी ३ गावानाच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.