शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

चोरट्यांनी केले महिलांच्या डब्याला लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 05:07 IST

पाच वर्षे केली लुटालूट : विरार ते वैतरणा दरम्यानच्या प्रवासात करायचे चोऱ्यामाºया

नालासोपारा : पश्चिम रेल्वेच्या विरार ते वैतरणा या स्थानकादरम्यान महिलांच्या डब्यात भुरट्या चोरांकडून गेल्या पाच वर्षात ३९ लाख ३६ हजार ८२ हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. विरार ते वैतरणा या दोन स्थानकादरम्यान गेल्या पाच वर्षात महिलांच्या रेल्वे डब्यात चेन, मंगळसूत्र,पर्स व मोबाईल चोरीच्या ११२ घटना घडल्या आहेत.त्यात ३९ लाख ३६ हजार ८२ रुपयाच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. या दोन स्टेशनादरम्यान एवढ्या मोठ्या मुद्देमालाची चोरी झाल्यामुळे पालघर, डहाणू विभागातील महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

वसई रोड रेल्वे पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र हे मिरा रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान आहे. सन २०१३ या वर्षात चोरीच्या १२ घटना घडल्या असून त्यापैकी ९ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात ४३९९०० रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी २९६९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सन २०१४ या वर्षात चोरीच्या २० घटना घडल्या असून त्यापैकी ८ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात १०६५५१० रूपयाचा मुद्देमाल चोरीस गेला होता .त्यापैकी १९११०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सन २०१५ या वर्षात चोरीच्या ७ घटना घडल्या असून त्यापैकी ३ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 386429 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी 124670 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2016 या वर्षात 5 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 2 गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 170424 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता . त्यापैकी 53750 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2017 या वर्षात 30 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी ? गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 681747 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यापैकी 36699 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2018 या वर्षात 38 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 2 गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 1192072 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी 20500 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे.सुरक्षा धोक्यात, तपासात येतात अडचणीच् वसईतील शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी याबाबत रेल्वेकडून माहिती मिळवली असता फक्त एका स्थानकादरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या डब्यात चो-या होऊ लागल्याच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.चोºया भुरट्या स्वरुपाच्या असल्याने व गुजरातची सीमा अगदी जवळ असल्याने गुन्हेगार हिस्ट्रीशिटर नसतात. त्यांची कोणतीही कुंडली पोलिसांकडे नसते. गुन्हा केला की ते परराज्यात पळून जातात. यामुळे तपासात अडचणी निर्माण होतात

टॅग्स :localलोकलCrimeगुन्हाVasai Virarवसई विरार