शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

बचत गटांवर उपासमारीची वेळ

By admin | Published: July 10, 2015 10:33 PM

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ३५ आश्रमशाळा तसेच १७ वसतिगृहांना भाजीपाला तसेच भोजनपुरवठा करणाऱ्या आदिवासी महिला

डहाणू : डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ३५ आश्रमशाळा तसेच १७ वसतिगृहांना भाजीपाला तसेच भोजनपुरवठा करणाऱ्या आदिवासी महिला बचत गटांकडून शासन वार्षिक ठेके १५ आॅगस्टपासून काढून घेणार आहे. याचा फटका डहाणू, पालघर, तलासरी, वसई तालुक्यांना बसणार असल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे शेकडो महिला बचत गट तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो महिलांवर बेकारी व उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास मुलाबाळांसह आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी महिला बचत गटांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.जिल्ह्यातील दऱ्याखोऱ्यांत, डोंगरकुशीत दारिद्र्यात खितपत पडलेल्या अनुसूचित जमातीच्या लोकांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाने वरील ठिकाणच्या शहरी, ग्रामीण आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृहे स्थापन करून शिक्षणाची सोय केली. शिवाय, शिक्षणाबरोबरच सुमारे २० हजार विद्यार्थी, विद्यार्थिनींना सकाळी दूध, अंडी, उपमा, शिरा, सफरचंद तर दुपारी भाजी-चपाती, भात-भाजी, वरण, कोशिंबीर देऊ करून पोटभर जेवणाची व्यवस्था केली. त्यामुळे रोजगारासाठी इतर जिल्ह्यांत स्थलांतरित होणाऱ्या हजारो आदिवासी कुटुंबांसाठी ही योजना एका अर्थाने आर्थिक नाडीच ठरली होती. दरम्यान डहाणू, पालघर, तलासरी, जव्हार यासारख्या आदिवासीबहुल तालुक्यांतील वसतिगृहे तसेच आश्रमशाळांना भोजन, भाजीपाला, अंडी, केळी, दूध इ. वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम स्थानिक आदिवासी महिला बचत गटांकडे सोपविण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागांतील महिला बचत गट वर्षानुवर्षे हे काम करून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. तर, शासनाने २०१५-२०१६ च्या शैक्षणिक वर्षासाठीदेखील निविदा जाहीर करून आश्रमशाळा व वसतिगृहांना निरनिराळ्या वस्तू तसेच भोजनठेका पुरवठा करणाऱ्या शेकडो महिला बचत गटांना आदेश देऊन काम सुरू केले. परंतु शाळा, महाविद्यालये सुरू होऊन एक महिना उलटत नाही. एवढ्यातच शासनाच्या आदिवासी विभागाकडून १५ आॅगस्टपासून वसतिगृहे तसेच आश्रमशाळांतील महिला बचत गटांकडून भोजन तसेच विविध वस्तुपुरवठा करण्याचे काम काढून घेण्यात येणार असल्याने हजारो महिलांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. (वार्ताहर)