शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

वाढत्या जमीनविक्रीमुळे आदिवासी समाज भूमिहीन

By admin | Published: January 23, 2016 2:42 AM

विक्रमगड तालुक्यातील अनेक भागांतील गावांमध्ये आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे़ वर्षानुवर्षे हे आदिवासी शेती करीत आहेत व त्यावरच आपल्या

तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील अनेक भागांतील गावांमध्ये आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे़ वर्षानुवर्षे हे आदिवासी शेती करीत आहेत व त्यावरच आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असतात, परंतु आधुनिक युगाच्या वाढत्या औद्योगिकीकरणाचा फायदा घेत धनदांडग्यांनी कायद्यातील पळवाट शोधत आदिवासींच्या जमिनी हडप करण्याचा सपाटा लावलेला आहे़ त्यामुळे कोट्यवधींच्या जमिनीवर आदिवासींना येणाऱ्या काळात पाणी सोडावे लागणार आहे़ विक्रमगड हा तालुका आदिवासीबहुल म्हणून ओळखला जात असल्याने येथे जागा खूप कमी आहे़ तर, अधिक जमिनी आदिवासींच्या नावे आहेत़ त्यामुळे आदिवासींच्या गरीबी व अज्ञानाचा फायदा घेत जमिनीचे दलाल खोटीनाटी कागदपत्रे बनवून आदिवासींना भूमिहीन करत आहेत. जमिनीला सोन्याचा भाव आल्याने बक्कळ पैसा मिळतो, या भावनेने आलेला पैसा खाण्यापिण्यावर उडवून आदिवासी समाज भूमिहीन होत चाललेला आहे़ मात्र, भविष्यात पैसे संपल्यावर शेती करण्यासाठी जागाच नसल्याने उपाशी राहण्याची वेळ या आदिवासींवर येणार आहे़ गेल्या ६६ वर्षांत आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यात राज्यकर्ते व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कधीच रस दाखविला नाही. आजही तालुक्यातील आदिवासी समाज अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व रोजगार या मूलभूत गरजांपासून वंचित आहे़ त्यासाठी श्रमजीवी व आदिवासी संघटनांनी पुढाकार घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे व करीत आहे़ मात्र, आदिवासींच्या जमिनीची विक्री होत असल्याने येत्या काळात हा समाज भूमिहीन होण्याची भीती आहे.वनजमिनीवर आदिवासींचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी वनकायद्यांतर्गत आदिवासींच्या नावावर जमिनी करण्यासंदर्भात शासनदरबारी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. वनजमिनी आदिवासींच्या नावे करण्यासंदर्भात कायदा असला तरी आपल्या पूर्वीच्या वाडवडिलोपार्जित जमिनी आदिवासी समाजाने धनदांडग्यांना विकल्याने आदिवासी समाजाला पुन्हा एकदा जंगलावरच अवलंबून राहावे लागणार आहे़ विक्रमगड तालुक्यातील अनेक भागांतील आदिवासी आपल्या जमिनी पैशांच्या लोभाने धनदांडग्यांना विकल्याने या समाजाला भूमिहीन होण्याची वेळ आली आहे़ भविष्यात या आदिवासी समाजाला उपाशी राहण्याची वेळ येऊन ठेपणार आहे़ शासनाने आदिवासींच्या जमिनीवर कूळ कायदा कलम ३६ व ३६, ४३ ग, निसप्र अशा अटी टाकल्याने ही जमीन विक्री करण्यास परवानगीची आवश्यकता असते़ ती मिळविणेकामी खर्च येत असल्याने विकत घेणारे मालक सदरील जमिनीवर मूळ मालकाच्या नावे घर बांधून ते घर विकत घेऊन आपला ताबा जमवत आहेत़ असे अनेक प्रकार तालुक्यात पाहावयास मिळतील़ (वार्ताहर)