शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

चुळणेतील विकासकामांकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 00:09 IST

चुळणे गाव परिसरातील नैसर्गिक नाल्यावरील ब्रिज जुना झाल्याने तो तयार करण्यासाठी पालिकेकडून मार्च २०१९ मध्येच कामाला मंजुरी मिळाली होती

वसई : मागील अनेक वर्षे चुळणे गाव परिसरातील नाल्यांचे बांधकाम, पाणीसमस्या, रस्तेदुरुस्तीची कामे पालिकेला तक्रार करूनही अद्याप पूर्ण केलेली नाहीत. विशेषत: चुळणे गाव परिसरातील नैसर्गिक नाल्यावरील पूलदेखील जुना झाल्याने तो कमकुवत झाला आहे. ही सर्व रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी नुकतेच चुळणे ग्रामस्थ तथा जागृती सेवा संस्थेच्या वतीने जॅक गोम्स व शिवसेनेच्या किरण चेंदवणकर यांनी वसई-विरार महापालिका आयुक्त तथा  प्रशासक गंगाथरन. डी यांना निवेदन दिले आहे.

चुळणे गाव परिसरातील नैसर्गिक नाल्यावरील ब्रिज जुना झाल्याने तो तयार करण्यासाठी पालिकेकडून मार्च २०१९ मध्येच कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र,, या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. याखेरीज चुळणे गावाला लागून असलेल्या कौल हेरिटेज सिटीमध्ये १० वर्षांपूर्वी बांधलेल्या जलकुंभात जराही पाणी न सोडल्याने चुळणेवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

दरम्यान, पालिका अधिकारी यांच्याकडे याविषयी तक्रार केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.चुळणे ते सलोली व चुळणे ते गास या रस्त्यांचे डांबरीकरण पालिकेच्या वतीने करण्यात येणार होते.  यासाठी लागणारी खडी आणि माती आणून ठेवण्यात आली आहे, परंतु त्याकडे लक्ष दिले गेले नसल्याने संपूर्ण खडी रस्ताभर विखुरली आहे. येथील विकासकामांच्या रखडपट्टीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे जागृती सेवा संस्थेचे जॅक गोम्स यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार