शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

‘स्मार्ट सिटी’साठी एकमत गरजेचे

By admin | Published: August 09, 2015 11:00 PM

वसई-विरार शहर महानगरपालिकेला सॅटेलाइट सिटीचा दर्जा देणाऱ्या सरकारने स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट न करून या भागावर अन्याय केला आहे.

दीपक मोहिते, वसईवसई-विरार शहर महानगरपालिकेला सॅटेलाइट सिटीचा दर्जा देणाऱ्या सरकारने स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट न करून या भागावर अन्याय केला आहे. वास्तविक, उपप्रदेश सध्या विकासाच्या वाटेवर असताना असे होणे मुळातच चुकीचे आहे. वाढती लोकसंख्या आणि संसाधनांची उपलब्धता यांची सांगड घालून उपप्रदेशाला विकासाच्या वाटेवर नेणे, हे फार मोठे आव्हान नगरपालिकेसमोर आहे. अशा वेळी केंद्र व राज्य सरकारने या महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे होते. परंतु, नेमके याच योजनेतून महानगरपालिकेला वगळण्यात आले.रेल्वेचे चौपदीकरण, चर्चगेट-डहाणू उपनगरीय रेल्वे सेवा, महानगरपालिकेची निर्मिती, पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता विविध स्तरांवर होत असलेले प्रयत्न, यामुळे उपप्रदेशामध्ये नागरीकरणाला प्रचंड वेग आला आहे. लोकसंख्या सुमारे १९ लाखांवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य व स्वायत्त संस्था आर्थिकदृष्ट्या सबळ होणे आवश्यक होते. केंद्र तसेच राज्य सरकारकडून विविध योजना कार्यान्वित करण्यात येत असतात. अशा वेळी ज्या महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशांना नव्या योजनेमध्ये सहभागी करून घ्यायला हवे. महानगरपालिका स्वत:चे आर्थिक स्रोत निर्माण करीत असते. परंतु, पालक म्हणून केंद्र व राज्य सरकारने देखील त्यांची जबाबदारी उचलायला हवी. एकीकडे जकात नाही तर दुसरीकडे स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका केवळ घरपट्टीच्या महसूलातून विकासकामे कशी करू शकेल? सॅटेलाइट सिटी योजनेंंतर्गत मिळालेल्या आर्थिक साहाय्यातून प्रदेशातील अनेक विकासकामे मार्गी लागली, तर अनेक प्रगतीपथावर आहेत. म्हणून स्मार्ट सिटी योजनेत वसई-विरार महानगरपालिकेचा समावेश होणे आवश्यक होते. उपप्रदेशाच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी महानगरपालिकेला अतिरिक्त जलकुंभ उभारणे आवश्यक आहे. विविध शासकीय संस्थांकडून आर्थिक निधी उभारण्याचे काम सुरू आहे. अशा वेळी राजकारण आडवे येता कामा नये. सॅटेलाइट सिटी योजनेसाठी जी महानगरपालिका पात्र ठरते, तीच महानगरपालिका स्मार्ट सिटी योजना प्रक्रियेत का निवडली जाऊ शकत नाही. यामागील तर्कशास्त्र सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे आहे.पालकमंत्री व तमाम लोकप्रतिनिधी अशा महत्त्वाच्या प्रश्नावर एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या उपप्रदेशाचा विकास ही सर्वांची सामूहिक जबाबदारी ठरली पाहिजे, तरच उपप्रदेशाचा खऱ्या अर्थाने विकास साधू शकेल. भविष्यात महानगरपालिकेसमोर विकासाचे अनेक प्रश्न उभे ठाकणार आहेत. त्यामध्ये पाणी, सांडपाण्याचा निचरा, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींवर मोठी जबाबदारी येते.