शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

‘उत्तन-विरार’साठी कांदळवनावर कुऱ्हाड, ३८ एकर कांदळवन क्षेत्र बाधित होणार; प्रस्ताव पर्यावरण मंजुरीसाठी सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 08:43 IST

'Uttan-Virar' दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल ३८ एकर क्षेत्रफळावरील कांदळवन तोडावे लागणार आहे.

- अमर शैला मुंबई -  दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल ३८ एकर क्षेत्रफळावरील कांदळवन तोडावे लागणार आहे. या प्रकल्पाच्या कामात तब्बल ८,४२० तिवराच्या झाडांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पर्यावरण मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रस्तावातून ही बाब समोर आली आहे. 

एमएमआरडीए ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चून उत्तन विरार सागरी सेतू उभारणार आहे. हा सागरी सेतू थेट मुंबई -दिल्ली एक्स्प्रेसवे बरोबर विरारजवळ जोडला जाणार आहे. त्याची लांबी ५५.४२ किमी आहे. उत्तन, वसई आणि विरार या भागांत सागरी सेतूला कनेक्टर दिला जाणार आहे. हा सागरी सेतू पर्यवरण संवेदनशील भागातून जाणार आहे. तसेच, या सागरी सेतूच्या कनेक्टरच्या मार्गात खारफुटी जमीन, भरती-ओहोटीचे क्षेत्र, खाऱ्या पाण्याचे तलाव आणि मत्स्य क्षेत्र येत आहे. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणात आणि घनदाट असे कांदळवन क्षेत्र आहे. यातील उत्तन कनेक्टर हा तब्बल १० किमी लांबीचा आहे. यामध्ये तब्बल २१ एकर कांदळवन क्षेत्र नष्ट होणार आहे. तर, विरार कनेक्टर हा १८.९५ किमी लांबीचा असून, या भागात १६.५ एकर कांदळवन क्षेत्र बाधित होणार असल्याचे समोर आले आहे. सीआरझेड मंजुरी मिळाल्यानंतर एका वर्षाच्या कालावधीत हे कांदळवण तोडले जाणार आहे. 

या प्रकल्पाच्या कामाच्या कामासाठी नुकतीच एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. येत्या काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळाकडूनही त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षात या प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदार नेमला जाणार आहे. 

प्रकल्पासाठी २११ हेक्टर जमीन लागणारया प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल २११ हेक्टर जमीन एमएमआरडीएला लागणार आहे. यात २.५ हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे, असेही प्रस्तावातून समोर आले आहे. 

१९० एकर क्षेत्रावर नव्याने कांदळवन लावणारप्रकल्पात ३८ एकर क्षेत्रावरील कांदळवण बाधित होणार आहे. याची भरपाई म्हणून १९० एकर क्षेत्रावर कांदळवणाचे रोपण केले जाणार आहे, असेही एमएमआरडीएने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMumbaiमुंबई