शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

उत्तन, वसईचे नाखवा दर्यावर !

By admin | Published: August 06, 2015 2:50 AM

समुद्रातील वादळी वारे व तुफानी लाटांच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील मच्छीमारांनी ११ आॅगस्टनंतर समुद्रात मासेमारीला जाण्याचे

पालघर : समुद्रातील वादळी वारे व तुफानी लाटांच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील मच्छीमारांनी ११ आॅगस्टनंतर समुद्रात मासेमारीला जाण्याचे एकमताने ठरविले होते. मात्र, अधिक मासे मिळण्याच्या हव्यासापोटी उत्तन, वसई भागातील काही मच्छीमारांच्या बोटींनी समुद्रात बोटी उतरविल्याने सातपाटी, मुरबे, डहाणू भागातील काही मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यासाठी घेतलेले पास, परवाने देण्यासाठी संस्थांकडे तगादा लावला आहे.केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेली १ जून ते ३१ जुलैपर्यंतची पावसाळी मासेमारीबंदी उलटल्यानंतर कस्टम विभागाने मासेमारीला जाण्यासाठी परवाने जारी केले आहेत. परंतु, समुद्रात अजूनही वादळी वारे व तुफानी लाटा उसळत असल्याने पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील सहकारी संस्थांनी एकमताने ११ आॅगस्टनंतर मासेमारीला जाण्याचा निर्णय घेतल्याचे काही मच्छीमार प्रतिनिधींनी जाहीर केले होते. परंतु, मच्छीमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था या सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थांनी डिझेल, बर्फ वितरण बंद करून पासेस देण्यास नकार दिल्याचे राजन तरे या मच्छीमाराने लोकमतला सांगितले. गेल्या वर्षी मासेमारी उत्पादन कमी झाल्याने अनेक मच्छीमार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. समुदातील वादळी वाऱ्यांची सर्वांनाच भीती असते, परंतु सध्या वातावरण शांत असल्याने संस्थांनी पासेस दिल्यास अनेक मच्छीमार मासेमारीला जाण्यास तयार असल्याचे तरे यांनी सांगून वसई, उत्तन भागासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागातील अनेक ट्रॉलर्सही मासेमारीसाठी समुद्रात गेल्याने त्यांना तुम्ही कसे रोखणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन राजन मेहेर यांच्याशी संपर्क साधला असता ११ आॅगस्टला मासेमारीला जाण्याचा निर्णय हा समुदात वित्तहानी व आर्थिकहानी होऊ नये, यासाठी सर्वानुमते घेण्यात आलेला निर्णय होता, त्याचे पालन एैच्छिक आहे असे सांगितले.