शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Vasai Virar: नायगावमध्ये नागरिकांमध्ये खड्डयांमूळे संताप, रास्ता रोको करत पाच तास केली वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 5:01 PM

Vasai Virar News: वसई विरारमध्ये रस्त्यांवरील जीवघेणा खड्डयांमूळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. खड्डयांसाठी राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतरही प्रशासन खड्डे बुजवत नाही. नायगावच्या जूचंद्र नाका येथे खड्डयांसाठी मंगळवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.

- मंगेश कराळे नालासोपारा - वसई विरारमध्ये रस्त्यांवरील जीवघेणा खड्डयांमूळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. खड्डयांसाठी राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतरही प्रशासन खड्डे बुजवत नाही. नायगावच्या जूचंद्र नाका येथे खड्डयांसाठी मंगळवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास सहा तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. लोक कामासाठी आठ-आठ किलोमीटर चालत कामावर गेले. मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

नायगावचे रस्ते दरवर्षी पावसात पूर्णपणे तुटतात. कारण प्रत्येक वेळी कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जातात. पहिल्याच पावसात रस्ते खचून खराब होतात.  नायगावच्या रस्त्यांवर अगणित खड्डे पडल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. खड्डयांमूळे दररोज अपघात होत आहेत. नायगाव स्टेशन ते मुंबई अहमदाबाद महामार्ग पर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डयात गेला आहे. खड्यांमूळे रिक्षा चालवणे अवघड झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन खड्डे बुजवत नाही. खड्डयांयांमुळे दररोज रिक्षा खराब होत आहेत.  जितके पैसे कमावले तेवढे रिक्षाचा मेंटेनन्सला खर्च होतो, सीएनजीसाठी काशीमिऱ्याला जावे लागते, खड्डयांमूळे दिवस त्यातच जात असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. 

रिक्षा चालकांच्या विविध समस्यांबाबत नायगावच्या जूचंद्र नाक्याजवळ मंगळवारी सकाळी सहाशेहून अधिक रिक्षाचालकांचा सहभाग असलेल्या रिक्षामालक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.  यावेळी सहायक आयुक्त मनाली शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संजय यादव, पोलीस अधिकारी उपस्थित होते. १५ दिवसांत खड्डे बुजवले जातील, असे मनाली शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार